शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मग, शरद पवारांनाही कर्जमाफी द्यायची का?

By admin | Updated: June 7, 2017 05:49 IST

३१ आॅक्टोबरपूर्वी राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ३१ आॅक्टोबरपूर्वी राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यादृष्टीने वित्तविभागाने तयारी केली आहे. मात्र, सरसकट कर्जमाफीची मागणी चुकीची असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही शेतकरी आहे. आमची शेती आहे. मग, अशा शेतक-यांनाही कर्जमाफी द्यायची का, असा सवाल करतानाच अडचणीत सापडलेल्यांनाच कर्जमाफी दिली जाईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. शेतीबाबत मागील सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. हा संप सरकारविरोधात नाही. त्यामुळे सरकार शेतकरी संपाकडे सकारात्मक नजरेतून पाहत आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचेच आहे. त्यांच्या सर्व समस्या मार्गी लावायच्या आहेत. त्यांना चांगले आयुष्य द्यायचे आहे. मात्र त्याआधी छोट्या-छोट्या सुविधा पुरवण्यावर सरकार भर देत आहे. त्यांचे प्रश्न व्यवस्थितपणे समजून घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतीपूरक योजनांना प्रोत्साहन दिले जात आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.>‘मुख्यमंत्री एकाकी नाहीत’ शेतकरी संपादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस एकटे पडले आहेत. त्यांना कोणत्याच मंत्र्याची साथ मिळत नाही, असे बोलले जात होते, मात्र ही निव्वळ अफवा आहे. मुख्यमंत्री जेव्हा निर्णय घेतात तेव्हा ते सर्व मंत्र्यांशी चर्चा करतात. सर्वच मंत्री त्यांच्या पाठिशी आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले. मध्यावधी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कर्जमाफीसाठी आॅक्टोबरचा मुहूर्त निवडला का असे विचारले असता, १९९९ साली मध्यावधी निवडणुका घेण्याचा प्रयोग अंगलट आला होता. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांचा गप्पांना अर्थ नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.