शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

मग, शरद पवारांनाही कर्जमाफी द्यायची का?

By admin | Updated: June 7, 2017 05:49 IST

३१ आॅक्टोबरपूर्वी राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ३१ आॅक्टोबरपूर्वी राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यादृष्टीने वित्तविभागाने तयारी केली आहे. मात्र, सरसकट कर्जमाफीची मागणी चुकीची असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही शेतकरी आहे. आमची शेती आहे. मग, अशा शेतक-यांनाही कर्जमाफी द्यायची का, असा सवाल करतानाच अडचणीत सापडलेल्यांनाच कर्जमाफी दिली जाईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. शेतीबाबत मागील सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. हा संप सरकारविरोधात नाही. त्यामुळे सरकार शेतकरी संपाकडे सकारात्मक नजरेतून पाहत आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचेच आहे. त्यांच्या सर्व समस्या मार्गी लावायच्या आहेत. त्यांना चांगले आयुष्य द्यायचे आहे. मात्र त्याआधी छोट्या-छोट्या सुविधा पुरवण्यावर सरकार भर देत आहे. त्यांचे प्रश्न व्यवस्थितपणे समजून घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतीपूरक योजनांना प्रोत्साहन दिले जात आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.>‘मुख्यमंत्री एकाकी नाहीत’ शेतकरी संपादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस एकटे पडले आहेत. त्यांना कोणत्याच मंत्र्याची साथ मिळत नाही, असे बोलले जात होते, मात्र ही निव्वळ अफवा आहे. मुख्यमंत्री जेव्हा निर्णय घेतात तेव्हा ते सर्व मंत्र्यांशी चर्चा करतात. सर्वच मंत्री त्यांच्या पाठिशी आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले. मध्यावधी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कर्जमाफीसाठी आॅक्टोबरचा मुहूर्त निवडला का असे विचारले असता, १९९९ साली मध्यावधी निवडणुका घेण्याचा प्रयोग अंगलट आला होता. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांचा गप्पांना अर्थ नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.