शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

दोन दिवसांत पुन्हा खड्ड्यांत हरवले ठाणे

By admin | Updated: September 22, 2016 03:33 IST

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील खड्ड्यांना काही प्रमाणात मुलामा लावला गेला असला तरी तो पुन्हा उडाला

ठाणे : मॅरेथॉनच्या मुहूर्तावर, त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात शहरातील खड्ड्यांना काही प्रमाणात मुलामा लावला गेला असला तरी तो पुन्हा उडाला असून दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने शहराच्या विविध भागांत पुन्हा खड्डेच खड्डे असे चित्र दिसत आहे. पालिकेच्या कागदावर मात्र शहरात आजघडीला अवघे २०३ खड्डे असले तरी प्रत्यक्षात ही संख्या त्याहीपेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याचे चित्र आहे. खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने यंदा जेट पॅचर ही यंत्रणादेखील वापरली. परंतु, ती सपशेल फोल ठरली आहे. त्यात आता पावसाने पुन्हा एकदा आपला रंग दाखवल्याने शहरात पुन्हा खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे.ठाणे, कळवा तसेच मुंब्रा शहरातील अनेक भागांत अरु ंद रस्त्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होऊ लागली होती. ती भेदण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम शहरात राबवली. या मोहिमेत रस्त्यांचे रु ंदीकरण करण्याबरोबरच काही रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले. या कामांसाठी कोट्यवधी रु पये खर्च करण्यात आले. असे असतानाच ऐन गणेशोत्सवात त्यापैकी काही रस्त्यांवर खड्डे पडले होते. त्यामुळे महापालिका प्रशासन टीकेचे धनी ठरले होते. गणेशोत्सवाच्या आधी पालिकेची ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धा होणार होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते. त्यामध्ये शहरातील विविध मार्गांवरील खड्डे बुजवले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास सुरू होता. असे असतानाच गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाचा जोर वाढला असून या पावसामुळे शहरातील विविध मार्गांवर ते पुन्हा पडल्याचे चित्र आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील उड्डाणपुलांवरही ते पडल्याचे दिसून येते. घोडबंदर भागात नव्याने तयार केलेल्या सेवा रस्त्यांची दुर्दशा झाली असून मानपाडा भागात सेवा रस्ते अक्षरश: उखडले आहेत. त्याचप्रमाणे ठाणे, वागळे, कळवा आणि मुंब्रा भागांतील अंतर्गत रस्त्यांवरही काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. अपघात होऊ नये, म्हणून चालक वाहने सावकाश चालवत आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कोंडी होऊ लागली आहे. पालिकेने आजघडीला केवळ २०३ खड्डे बुजवण्याचे शिल्लक असल्याचा दावा केला आहे. परंतु, पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. >शहरात एकूण २९४१ खड्डे असून त्याचे क्षेत्रफळ ७ हजार ७३ एवढे आहे. यातील २७३९ खड्डे बुजवले असून त्याचे क्षेत्रफळ ६ हजार ७१२ एवढे असून आता केवळ २०४ खड्डे बुजवण्याचे शिल्लक असून त्याचे क्षेत्रफळ केवळ ३५३ एवढे असल्याचा दावा करण्यात आला आहे.