शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
4
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
5
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
6
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
7
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
8
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
9
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
10
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
11
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
12
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
13
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
14
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
15
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
16
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
17
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
18
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
19
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
20
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

'जयदेव' यांच्यामुळे ठाकरे बंधूंची जुळणार मनं ?

By admin | Updated: July 29, 2016 20:45 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब-याच वर्षांनंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

ऑनलाइन लोकमतमुबंई, दि. 29 - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब-याच वर्षांनंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल सव्वा तास राज-उद्धव यांच्यामध्ये चर्चा झाल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकांनी आगामी पालिका निवडणुकीत दोघे बंधू एकत्र येणार असल्याची आवई उठवली होती. मात्र राज आणि उद्धव यांच्या भेटीमागील खरं कारण लोकमतच्या सूत्रांकडून आम्हाला समजलं आहे.

राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीदरम्यान जयदेव ठाकरेंच्या मालमत्तेसाठीच्या न्यायालयीन लढाईवरच चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती लागली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अचानक भेटीवर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. जयदेव ठाकरेंच्या माध्यमातूनच राज आणि उद्धव यांची मनं पुन्हा जुळणार का?, असा विषय आता चर्चिला जाऊ लागला आहे. राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी जयदेव ठाकरे फक्त निमित्तमात्र आहेत. खरं तर या दोघांनीही एकत्र यावं असं उभ्या महाराष्ट्राला वाटतं आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजपच्या दबावतंत्रातली हवा आपोआपच निघून जाईल. काही दिवसांपूर्वीच्या भाजपाच्या भूमिकेवरून भाजप शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना जुमानत नसल्याचं समोर आलं आहे.

उद्धव ठाकरेंनी सत्तेतून बाहेर पडण्याचा भाजपला इशाराही दिला आहे. मनसेला सोबत घेतल्यास उद्धव ठाकरेंना भाजपला नामोहरम करणं सोपं जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेतल्यास मुंबई महापालिकेवर भगव्याची जादू कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात राज-उद्धव ठाकरे येतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.