शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे, वायकर यांची ९०० कोटींची जमीन खरेदी-निरुपम

By admin | Updated: August 3, 2016 05:58 IST

गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या भ्रष्टाचाराला पाठिशी घातले जात असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई : ठाकरे कुटुंबाशी असणाऱ्या व्यावसायिक संबंधांमुळेच गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या भ्रष्टाचाराला पाठिशी घातले जात असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. ठाकरे आणि वायकर कुटुंबियांनी रायगड जिल्ह्यात सुमारे ९०० कोटी रुपयांची जमीन खरेदी केल्याचा खळबळजनक आरोपही निरुपम यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील कोलई गावात जमीन खरेदी करण्यात आली आहे. २५ एकराच्या या जमिनीच्या सातबाऱ्यावर रश्मी ठाकरे यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असल्याचे निरुपम म्हणाले. याशिवाय साडेसहा लाख चौरस फुटांच्या जमिनीचीही खरेदी करण्यात आली असून त्याची किंमत ९०० कोटी रुपये असल्याचा दावा निरुपम यांनी केला.‘विजलक्ष्मी इन्फ्राकॉन’ या कंपनीत रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरे यांचे मामा दिलीप श्रृंगारपुरे संचालक आहेत. या कंपनीच्या माध्यमातून झोपु योजना राबविण्यात येतात. या कंपनीच्या जोगेश्वरी गुंफेजवळील प्रकल्पात पुरातत्त्व खात्याच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोपही निरुपम यांनी केला. संजय निरुपम यांनी यापूर्वीही वायकरांना लक्ष्य केले होते. वायकर यांनी आपल्या मतदारसंघात अनेक झोपु योजना राबविल्या आहेत. त्यात अनियमितता असल्याचा आरोप निरुपम यांनी केला होता. शिवाय, वायकर यांच्या कुटुंबियांशी संबंधित ट्रस्टने व्यायामशाळेच्या नावाखाली आरे कॉलनीतील २० एकर जमीन लाटल्याचाही आरोप त्यांनी केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात वायकर यांना क्लीन चिट दिली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्लीन चीटवरही निरुपम यांनी आक्षेप घेतला. झोपु योजना राबविणाऱ्या कंपनीचा राजीनामा दिल्याचा दावा वायकर यांनी केला आहे. मग, राजीनाम्यानंतर त्या कंपनीच्या बैठकांना वायकर का हजेरी लावतात? असा सवालही निरुपम यांनी केला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ‘मातोश्री’ला भेट देत भोजन घेतले होते. तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी वायकरांना क्लीन चीट देण्यास सांगितल्याचा दावाही निरुपम यांनी केला. (प्रतिनिधी)तर निरुपम यांना दलालीरायगड येथे खरेदी केलेल्या जमिनीची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात आधीच जाहीर केलेली आहे. त्यात लपविण्यासारखे काहीच नाही. ज्या गोष्टी मी स्वत:च आधी जाहीर केलेल्या आहेत, त्याच निरुपम सांगत असतील तर त्याला काहीही अर्थ नाही. मुळात निरुपम जमिनीच्या किंमतीचे जे आकडे सांगत आहेत ते चुकीचे आहेत. ती जमीन ९०० कोटींची आहे, असा निरुपमांचा दावा असेल तर त्यांना त्याची दलाली द्यायला मी तयार आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी निरुपम यांच्या आरोपांवर उत्तर देताना दिली. शिवाय या जमिनीतील ठाकरे कुटुंबियांच्या भागीदाराबाबत बोलताना ‘यात चुकीचे काय आहे’ असा सवाल वायकर यांनी केला. (प्रतिनिधी)