शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानामुळे पुढच्या ३० वर्षांत होणार उद्योगक्रांती

By admin | Updated: January 17, 2017 06:14 IST

तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे भौतिक, डिजिटल आणि जैविकमधील रेषा धूसर होत चालल्या आहेत.

मुंबई : तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे भौतिक, डिजिटल आणि जैविकमधील रेषा धूसर होत चालल्या आहेत. आता एक नवे जग आकार घेत आहे. यापूर्वी कधीही न आलेला अनुभव तंत्रज्ञानामुळे सर्वांना अनुभवता येत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उद्योग-व्यवसायातील अनेक अडथळे सहजरीत्या दूर होत आहेत. गेल्या १० वर्षांत ज्या व्यवसाय-उद्योगांना भरारी घेता येत नव्हती, असे उद्योग आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करू लागले आहेत. त्यामुळेच गेल्या ३०० वर्षांत मानवाने जितके साध्य केले, त्यापेक्षा अधिक पुढच्या ३० वर्षांत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साध्य करू शकणार असल्याचे प्रतिपादन उद्योगपती मुकेश अंबानी यांनी केले. मुंबई विद्यापीठाचा १६०व्या दीक्षांत पदवी समारंभ सोमवारी पार पडला. या समारंभाला राज्यपाल विद्यासागर राव, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मुकेश अंबानी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी स्नातकांना मार्गदर्शन केले. यंदाच्या समारंभात ३६ विद्यार्थिनींना सुवर्ण पदके, ५८ स्नातकांना पदके प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर, दोन कुलपती पारितोषिके आणि एक कुलपती पदकही बहाल करण्यात आले. अंबानी पुढे म्हणाले, ‘सध्याची तरुण पिढी एका वेगळ््या विश्वात जगत आहे. आयुष्य ही स्पर्धा नसून प्रवास आहे. ही पिढी वचनबद्ध, आशावादी आणि आदर्शवादी आहे. त्यामुळे स्पर्धा करताना स्वत:शीच स्पर्धा करा. चांगले व्यक्तिमत्त्व आणि वर्तणूक हे महत्त्वाचे गुण आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा.’ पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश आता आॅनलाइन पद्धतीने होणार असून, शुल्कदेखील आॅनलाइन घेतले जाणार असल्याचे कुलगुरुंनी स्पष्ट केले. ते म्हणाले, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत कलिना कॅम्पस आणि ठाण्यातील कॅम्पस आॅडिटोरिअम डिजिटल करण्यात येणार आहेत आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांत ४० व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)>डिजिटल लॉकर मुंबई विद्यापीठातून यंदा पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा डिजिटल लॉकर तयार करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची सर्व सटिर्फिकेट्स त्यांना उपलब्ध होणार आहेत. मुकेश अंबानींचा पहिला डिजिटल लॉकर तयार करण्यात आला. या डिजिटल लॉकरमुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळी त्यांची सर्टिफिकेट मिळणार आहेत.