शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

संघ बौद्धिकाचा पॅटर्न देशभर!

By admin | Updated: November 28, 2014 02:12 IST

2 डिसेंबर रोजी संघाने मंत्रिमंडळाचा ‘बौद्धिक’ वर्ग नागपुरात आयोजित केला असून, सरकार्यवाह भैयाजी जोशी मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

यदु जोशी - मुंबई
राष्ट्रीय स्वयंसेवक आणि  राज्य सरकार यांच्यातील समन्वयाची सुरुवात म्हणून 2 डिसेंबर रोजी संघाने मंत्रिमंडळाचा ‘बौद्धिक’ वर्ग नागपुरात आयोजित केला असून, सरकार्यवाह भैयाजी जोशी मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बौद्धिकातून संघाचे सरकारशी सूर जुळले, तर भाजपाशासित इतर राज्यांमध्येही अशा समन्वय बैठका आयोजित केल्या जातील,  असे  सूत्रंनी सांगितले. 
केंद्र आणि भाजपाशासित राज्य सरकारांशी  समन्वय ठेवण्याची जबाबदारी  संघामध्ये क्रमांक 2चे पद भूषविणारे भैयाजी जोशी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. भाजपाशासित सरकारांवर संघाची पकड यापुढील काळात अधिक मजबूत होईल आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून केली जात असल्याचे मानले जात आहे. भाजपाच्या एखाद्या मंत्र्याने कुठलीही गैरवर्तणूक केली तर ‘स्वयंसेवक’ बिघडला, अशी टीका माध्यमांतून केली जाते. शिवाय, इतर पक्षातून भाजपात येऊन मंत्री झालेल्यांना संघ विचार आणि संस्कारांची जाणीव नसते. या दोन्ही प्रकारच्या मंत्र्यांना संघाची विचारधारा आणि अपेक्षा याबाबत यापुढे सातत्याने बौद्धिक दिले जाणार आहे. संघविचारचे दूत म्हणून मंत्र्यांनी  चारित्र्यसंपन्नच असले पाहिजे, असा संघाचा आग्रह असेल. 
याआधी संघ आणि भाजपात समन्वयाचे काम सरकार्यवाह सुरेश सोनी करायचे. लखनौमध्ये अलीकडे झालेल्या संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत संघ-भाजपा आणि संघ व सरकार असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले. त्यात संघ-सरकार समन्वयाचे काम भैयाजी जोशी यांच्याकडे तर संघ-भाजपात समन्वयाचे काम उत्तर प्रदेशातील  डॉ. कृष्णगोपाल यांच्याकडे सोपविण्यात आले. 
सुरेश सोनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटचे मानले जात होते. संघाकडून करण्यात आलेल्या काही सूचना मोदी यांच्याकडून मानल्या जात नाहीत, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती. त्यातूनच सोनी यांच्याकडील समन्वयाची जबाबदारी काढून घेण्यात आली. त्यामुळे अशा पदांवर संघाच्या भूमिकेवर ठाम राहणारीच व्यक्ती असली पाहिजे, म्हणूनच  सरसंघचालक  मोहन भागवत यांनी सरकार्यवाह जोशी आणि कृष्णगोपाल यांना पसंती दिल्याचे म्हटले जाते. 
 
सरसंघचालकांव्यतिरिक्त संघाच्या इतर पदांची निवडणूक येत्या पाच महिन्यांत होणार आहे. दर तीन वर्षानी ही निवडणूक होत असते. या वेळी पदाधिका:यांमध्ये काही महत्त्वाचे बदल कार्यकारिणीमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.