शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

संघ कुणाचाच रिमोट कंट्रोल नाही

By admin | Updated: June 13, 2014 01:32 IST

डॉ. आंबेडकरांनीही संविधान लिहिल्यानंतर स्वातंत्र्य, समता ठीक आहे, पण जोपर्यंत बंधूता निर्माण होणार नाही तोपर्यंत संविधानाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असे विधान केले होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर

सरसंघचालक मोहन भागवत : तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप नागपूर : डॉ. आंबेडकरांनीही संविधान लिहिल्यानंतर स्वातंत्र्य, समता ठीक आहे, पण जोपर्यंत बंधूता निर्माण होणार नाही तोपर्यंत संविधानाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असे विधान केले होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य, समता आली, पण बंधूता आली नाही. डॉ. हेडगेवार यांनीही बंधूता देशात निर्माण करण्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम केले. आजदेखील संघ तेच काम प्रामाणिकपणे करतो आहे. संघ कुणावरही ‘रिमोट कंट्रोल’ चालविण्याचे काम करीत नाही, असे मत रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी व्यक्त केले. संघ शिक्षा वर्गाच्या तृतीय वर्गाचा समारोप आज करण्यात आला. याप्रसंगी स्वयंसेवकांना उद्देशून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे प्रणेता श्री श्री रविशंकर, महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता, संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी डॉ. विश्वनाथ लाल निगम उपस्थित होते. भागवत म्हणाले, संघ वैभवशाली आणि चारित्र्यसंपन्न भारताचे स्वप्न कार्यकर्त्यांना देतो आणि स्वयंसेवक त्यासाठी आयुष्यभर काम करतात. यंदा देशातल्या निवडणुकांत परिवर्तन दिसते आहे. लोकांना जे लोक निवडून हवे होते, ते आले. यासाठी संघाने काही केले नाही. निवडणूक आयोगाने म्हटलेलेच आवाहन संघाने केले. मतदानाचा आग्रह धरला. त्यामुळे संविधानाप्रमाणे आचरण असलेले लोक निवडून आले. पण केवळ सरकारमुळे बदल होत नाहीत. त्यासाठी समाज आणि राष्ट्र जागृत असले पाहिजे.