शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षण पंधरवडा

By admin | Updated: December 31, 2016 02:56 IST

प्रत्येक मुलास समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास निरक्षरता कमी होऊन प्रगती होईल. शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून राज्यातील शाळांमध्ये ३ ते २६

मुंबई : प्रत्येक मुलास समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास निरक्षरता कमी होऊन प्रगती होईल. शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून राज्यातील शाळांमध्ये ३ ते २६ जानेवारी २०१७ दरम्यान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्यात येणार आहे. बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ प्रमाणे प्रत्येक शाळेत पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी आणि राज्यातील एकही मुलगी शाळेपासून वंचित राहू नये यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात अजूनही काही ठिकाणी मुलींच्या शिक्षणाला महत्त्व दिले जात नाही. मुलीच्या शिक्षणावर कमी खर्च केला जातो. त्यामुळे अनेकदा मुलींना अर्धवट शाळा सोडावी लागते. असे घडू नये म्हणून मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जा मिळवून देण्यासाठी पंधरवड्यात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून जनजागृती करण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. त्याचबरोबर परिस्थितीमुळे शिक्षणात खंड पडू नये म्हणून उपक्रम राबविला जाणार आहे. मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, वैचारिक आणि तार्किक क्षमता निर्माण करणे, शारीरिक क्षमता वाढवणे यावर भर दिला जाणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधून विद्यार्थिनींची होणारी गळती कमी करण्यासाठीही हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)