शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भोर, वेल्हे, मुळशीला मिळणार शिक्षक

By admin | Updated: May 21, 2016 01:01 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या वर्षी पहिल्यांदा समानीकरणाच्या नियमानुसार बदल्या करण्याचा निर्णय घेतला

पुणे : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या वर्षी पहिल्यांदा समानीकरणाच्या नियमानुसार बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे ज्या तालुक्यात सर्वाधिक जागा रिक्त आहेत, त्यांना शिक्षक मिळणार आहेत. मात्र, जेथे शिक्षक जास्त आहेत तेथील शिक्षकांना दुसऱ्या तालुक्यात जावे लागणार आहे. त्यामुळे या बदली प्रक्रियेला शिक्षक संघ व शिक्षक समिती या दोन्ही संघटनांनी विरोध केला आहे.जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या आता २७ व २८ मे रोजी होणार आहेत. यात पेसाच्या म्हणजे डोंगराळ व दुर्गम भागात होणाऱ्या बदल्यांबरोबर समानीकरणाच्या बदल्याही करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.समानीकरण म्हणजे सर्व तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा सारख्या असाव्यात. ज्या तालुक्यात नेहमीच पदांची रिक्तता सरासरीपेक्षा जास्त असते अशा भागातील/ तालुक्यातील रिक्त पदे प्रशासकीय/ विनंती बदलीने भरणे. यात तालुक्यातील एकूण पदे व रिक्त पदे याची टक्केवारी काढली जाते व सर्व तालुक्यात समान टक्के शिक्षक नियुक्त केले जातात. समानीकरणात तालुक्यातील मंजूर पदांपैकी फक्त ५ टक्केच रिक्त पदे ठेवता येणार आहेत. म्हणजे ९५ टक्के शिक्षक प्रत्येक तालुक्यात द्यावे लागणार आहेत. जिल्ह्यात सध्या उपशिक्षक, मुख्याद्यापक, केंद्रप्रमुमुख, पदवीधर शिक्षक व आदीवासी भागातील शिक्षक मिळून १२ हजार ५0८ शिक्षक जिल्ह्याला मंजूर आहेत. त्यापैकी ११ हजार ६३७ शिक्षक कार्यरत असून ८७१ शिक्षक कमी आहेत. जिल्ह्यात सर्वांत जास्त कमी शिक्षक आहेत ते भोर ७१, मुळशी १0२, वेल्हे ७८ या तालुक्यांत. हे दुर्गम असल्याने तेथे शिक्षक जायाला तयार होत नाहीत. या समानीकरणामुळे या तालुक्यांना जादाचे शिक्षक मिळणार आहेत. नुकतेच प्रगत शिक्षण कार्यक्रमात आपला जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला. यात भोर व वेल्हे या तालुक्यांतील सर्वांत कमी शाळा पात्र ठरल्या. याचे कारण येथे शिक्षक कमी होते. समानीकरण झाल्याने येथे शिक्षक मिळणार आहेत. येथे शिक्षक मिळावेत म्हणून लोकप्रतिनिधींसह सर्वांचीच मागणी होती. असे असले तरी या बदली प्रक्रियेला शिक्षक संघ व शिक्षक समिती या दोन्ही संघटनांनी विरोध केला आहे. यामुळे शिक्षकांना इतर तालुक्यात जावे लागणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)>सर्वच शिक्षकांना रस्त्यालगत व शहरालगतची शाळा हवी असते. दुर्गम भागात गेल्या काही वर्षांत शिक्षकांची खूपच कमी आहे. त्यामुळे तेथील गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे यावर्षी शासनाच्या समानीकरण धोरणानुसारच बदल्या करण्यात येणार आहेत.- शुक्राचार्य वांजळे, सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद>समानीकरणाचा निर्णय जरी शासनाचा असला, तरी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून समानीकरण करू नये. यापूर्वी आपल्या जिल्ह्यात ते कधीही झाले नाही. बिंदुनामावलीनंतर ज्या जागा आपण भरणार आहोत त्यातील शिक्षकांना जास्त रिक्ते पदे असलेल्या तालुक्यात नंतर टाकता येईल. मात्र, सध्या कार्यरत शिक्षकांना हलवू नये.- बाळासाहेब मारणे अध्यक्ष, शिक्षक संघ