शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

अधिवेशनात शिक्षक संघटनांचा हल्लाबोल

By admin | Updated: December 8, 2014 03:02 IST

शैक्षणिक वर्ष २०१३-१४ च्या शाळांच्या कर्मचारी संच निर्धारणावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती देऊनही

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०१३-१४ च्या शाळांच्या कर्मचारी संच निर्धारणावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती देऊनही राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवित आहेत. याच्या विरोधात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर येथे शिक्षक संघटनांच्या वतीने हल्लाबोल करण्यात येणार आहे.संच निर्धारणामुळे राज्यात हजारोंच्या संखेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले. तसेच तीन वर्षे सेवा कालावधी पूर्ण न झालेल्या शेकडो शिक्षणसेवकांना सेवामुक्त्त व्हावे लागत आहे. शासनाच्या या शिक्षक व शिक्षण हितविरोधी कृतीला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व अन्य संघटनांसह उच्च न्यायालयात शिक्षक आमदार नागो गाणार यांनी आव्हान दिले. या याचिकेवर उच्च न्यायालयाने शासनाच्या या कृतीला स्थगिती दिली. मात्र शिक्षणाधिकारी याचा चुकीचा अर्थ काढून शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या आमदारांच्या बैठकीत आंदोलनकर्त्यांनी बाजू मांडत शैक्षणिक सत्र २०१३-१४ च्या कालबाह्य संच निर्धारणानुसार कारवाई करणे नियमबाह्य असल्याचे विषद केले. संच मान्यतेमध्ये उणिवा असल्यामुळे शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविणे, शिक्षणसेवकांची सेवा समाप्त करणे बंद करावे, अशी मागणी केली. यावर शिक्षणमंत्र्यांनी एकाही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. परंतु दुसरीकडे शिक्षणाधिकारी नियमबाह्य पद्धतीने कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्याचे आदेश देत असल्याने राज्यभर सावळागोंधळ सुरू आहे. या विरोधात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शक्षक संघटनांच्यावतीने हल्लाबोल करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)