शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पंचनाम्याच्या कामातून शिक्षकांची सुटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2015 00:27 IST

एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यावर त्याचा पंचनामा करण्यासाठी सरकारी कर्मचारी पंच म्हणून शिक्षकांना नेमण्याचे आदेश रद्द करण्याचा निर्णय गृहमंत्री रणजीत पाटील यांनी घेतला आहे

मुंबई : एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यावर त्याचा पंचनामा करण्यासाठी सरकारी कर्मचारी पंच म्हणून शिक्षकांना नेमण्याचे आदेश रद्द करण्याचा निर्णय गृहमंत्री रणजीत पाटील यांनी घेतला आहे. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत झालेल्या या निर्णयाने लाखो शिक्षकांना पंचनाम्याच्या कामातून मुक्ती मिळणार आहे.राज्याच्या गृह खात्याने १२ मे रोजी पंचनामा करताना लागणारा सरकारी कर्मचारी म्हणून शिक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश काढले होते. त्याचप्रमाणे पंचनाम्याच्या कामात सहभागी न होणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णयही त्या वेळी घेण्यात आला होता. मात्र जुने आदेश रद्द करताना पंचनाम्याचे काम नाकारलेल्या शिक्षकांवरील फौजदारी गुन्हेही मागे घेण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.बैठकीत पाटील यांच्यासोबत गृह विभागाचे मुख्य अधिकारी आणि शिक्षक आमदार रामनाथ मोते यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक परिषदेने शिक्षकांना या कामातून वगळण्याची मागणी केली होती. परिषदेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच सरकारने जुने आदेश रद्द केल्याची प्रतिक्रिया परिषदेचे पदाधिकारी अनिल बोरनारे यांनी दिली.