शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

टॅक्सी-रिक्षांचा संप अखेर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 05:49 IST

ओला, उबरसह अ‍ॅग्रीगेट सेवा देणाऱ्या टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत, या मागणीसाठी २९ आॅगस्टपासून टॅक्सी-रिक्षांचा बेमुदत संप पुकारण्यात आला होता.

मुंबई : ओला, उबरसह अ‍ॅग्रीगेट सेवा देणाऱ्या टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत, या मागणीसाठी २९ आॅगस्टपासून टॅक्सी-रिक्षांचा बेमुदत संप पुकारण्यात आला होता. मात्र, या संपातून टॅक्सी संघटनांनी पुन्हा माघार घेतली. १ सप्टेंबरला मुख्यमंत्री व परिवहनमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन मिळाल्यानंतर जय भगवान महासंघ व स्वाभिमान टॅक्सी संघटनांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेतल्याची घोषणा केली. ओला, उबर टॅक्सींमुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांचा रोजगार बुडत आहे. सरकारने तर या कंपन्यांना खुली सूटच दिली आहे. त्यामुळे ओला, उबरसारख्या खासगी सेवांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी करत नव्यानेच आलेल्या जय भगवान महासंघातर्फे २१ जून रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले आणि त्याला हिंसक वळणही लागले होते. त्यानंतर, चर्चेत आलेल्या या महासंघातर्फे २६ जुलै रोजी संपाची हाक दिली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देताच संप मागे घेण्यात आला होता. त्यानंतर, पुन्हा महासंघाकडून २९ आॅगस्ट रोजी बेमुदत टॅक्सी-रिक्षा संपाची हाक दिली आणि त्यात स्वाभिमान टॅक्सी संघटनाही उतरली. या संदर्भात रविवारी (२८ आॅगस्ट) परिवहन आयुक्तालयातही टॅक्सी संघटनांची बैठक झाली. या बैठकीवर स्वाभिमानकडून बहिष्कार टाकण्यात आला आणि तर बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर फक्त आश्वासनच मिळाल्याने, जय भगवान महासंघाने संपाची भूमिका घेतली होती. मात्र, संध्याकाळी या दोन्ही संघटनांकडून बेमुदत पुकारलेला संप मागे घेण्यात आल्याची घोषणा केली. परिवहनमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेत असल्याचे जय भगवान व स्वाभिमानकडून स्पष्ट करण्यात आले. १ सप्टेंबर रोजी परिवहनमंत्र्यांसोबत बैठक बोलाविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)