शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

टॅक्सी-रिक्षांचा संप अखेर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 05:49 IST

ओला, उबरसह अ‍ॅग्रीगेट सेवा देणाऱ्या टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत, या मागणीसाठी २९ आॅगस्टपासून टॅक्सी-रिक्षांचा बेमुदत संप पुकारण्यात आला होता.

मुंबई : ओला, उबरसह अ‍ॅग्रीगेट सेवा देणाऱ्या टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत, या मागणीसाठी २९ आॅगस्टपासून टॅक्सी-रिक्षांचा बेमुदत संप पुकारण्यात आला होता. मात्र, या संपातून टॅक्सी संघटनांनी पुन्हा माघार घेतली. १ सप्टेंबरला मुख्यमंत्री व परिवहनमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन मिळाल्यानंतर जय भगवान महासंघ व स्वाभिमान टॅक्सी संघटनांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेतल्याची घोषणा केली. ओला, उबर टॅक्सींमुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांचा रोजगार बुडत आहे. सरकारने तर या कंपन्यांना खुली सूटच दिली आहे. त्यामुळे ओला, उबरसारख्या खासगी सेवांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी करत नव्यानेच आलेल्या जय भगवान महासंघातर्फे २१ जून रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले आणि त्याला हिंसक वळणही लागले होते. त्यानंतर, चर्चेत आलेल्या या महासंघातर्फे २६ जुलै रोजी संपाची हाक दिली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देताच संप मागे घेण्यात आला होता. त्यानंतर, पुन्हा महासंघाकडून २९ आॅगस्ट रोजी बेमुदत टॅक्सी-रिक्षा संपाची हाक दिली आणि त्यात स्वाभिमान टॅक्सी संघटनाही उतरली. या संदर्भात रविवारी (२८ आॅगस्ट) परिवहन आयुक्तालयातही टॅक्सी संघटनांची बैठक झाली. या बैठकीवर स्वाभिमानकडून बहिष्कार टाकण्यात आला आणि तर बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर फक्त आश्वासनच मिळाल्याने, जय भगवान महासंघाने संपाची भूमिका घेतली होती. मात्र, संध्याकाळी या दोन्ही संघटनांकडून बेमुदत पुकारलेला संप मागे घेण्यात आल्याची घोषणा केली. परिवहनमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेत असल्याचे जय भगवान व स्वाभिमानकडून स्पष्ट करण्यात आले. १ सप्टेंबर रोजी परिवहनमंत्र्यांसोबत बैठक बोलाविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)