शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

क्लृप्त्या लढवूनही करवसुली असमाधानकारकच!

By admin | Updated: April 4, 2017 04:28 IST

केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी विविध क्लृप्त्या लढवूनही महापालिकेकडून समाधानकारक वसुली झालेली नाही

कल्याण : जास्तीतजास्त करवसुली व्हावी, यासाठी केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी विविध क्लृप्त्या लढवूनही महापालिकेकडून समाधानकारक वसुली झालेली नाही. उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट ५२२ कोटी रुपये इतके देण्यात आले होते. परंतु, महापालिकेकडून केवळ ३१४ कोटी १७ लाखांची वसुली झाली आहे. मागील वर्षापेक्षा यंदा केलेल्या वसुलीचा आकडा सर्वाधिक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, करवसुलीत ‘ब’ प्रभाग अव्वल ठरला असून त्यात ८९ कोटी ८५ हजार रुपयांची करवसुली झाली आहे. १ एप्रिल ते ३१ मार्चदरम्यान केडीएमसीच्या महासभेने मालमत्ता, पाणीपट्टी आणि अन्य करवसुलीद्वारे ७७८ कोटी १८ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. मालमत्ताकर ५२२ कोटी ९ लाख, पाणीबिलवसुलीचे ८६ कोटी ९ लाख, तर अन्य कराच्या माध्यमातून १२० कोटींचे लक्ष प्रशासनाला देण्यात आले होते. यात मालमत्ताकरापोटी ३१४ कोटी १७ लाख, पाणीबिलापोटी ५५ कोटी ५७ लाख, तर नगररचना विभागाने नगररचना फी शुल्कापोटी १०९ कोटी ६० लाख रुपये कराची वसुली केली आहे. करवसुलीची टक्केवारी पाहता संपूर्ण करवसुली ६१.४४ टक्के झाली आहे. यात मालमत्ताकर ५९. ९० टक्के, पाणीबिल ६४.८३ टक्के आणि विशेष अधिनियमातील वसुली ९१.३३ टक्के झाली आहे. मागील वर्षी मालमत्ताकरापोटी २६६ कोटी २६ लाख रुपये वसुली झाली होती. यंदा ती ३१४ कोटी १७ लाख झाल्याने ती समाधानकारक व चांगली झाली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. करवसुलीसाठी रवींद्रन यांनी विविध क्लृप्त्या लढवल्या होत्या. यात थकबाकीदारांविरोधात कठोर केलेल्या कारवाईत मालमत्ता जप्त करणे, नळजोडण्या खंडित करणे, थकबाकीदारांच्या आवारात कचरा टाकणे, कचरा न उचलणे, त्यांच्या आवारात कचराकुंडी ठेवणे, अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या होत्या. वर्षभरात मालमत्ताकरापोटी ३१४ कोटी १७ लाख वसूल केले असले, तरी ३१ मार्चला अखेरच्या दिवशी २१ कोटी २० लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. आयुक्तांनी करवसुलीत टाळाटाळ करणाऱ्या काही कर्मचारी आणि करअधीक्षकांवर निलंबन कारवाईचा बडगाही उगारला होता. याउपरही करवसुली समाधानकारक झालेली नसल्याचे वास्तव आहे. करवसुलीत ‘ब’ प्रभाग अव्वल ठरला आहे. या प्रभागात मालमत्ताकरातून ८९ कोटी ८५ हजार ६६२ रुपयांची, तर पाणीबिलापोटी ८ कोटी ६० लाख १५ हजार ५५७ रुपयांची वसुली झाली आहे. त्याखालोखाल ‘क’ प्रभागाची वसुली झाली आहे. या प्रभागातून मालमत्ताकरापोटी ४१ कोटी आणि पाणीपट्टी पाच कोटी ७६ लाखांची वसुली झाली आहे. २७ गावांच्या ‘ई’ प्रभाग कार्यालयाने मालमत्ताकराचे १० कोटी ९१ लाख आणि पाणीपट्टीचे ७ कोटी ७२ लाख रुपये वसूल केले आहेत. (प्रतिनिधी)>५०३ मालमत्ता जप्त केडीएमसीने केलेल्या कारवाईअंतर्गत ५०३ मालमत्ता जप्त केल्या असून २१ मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. आंबिवली येथील नेपच्यून बिल्डर्सचे कार्यालय सील केले होते. त्यानंतर, या विकासकाने २१ सदनिका महापालिकेकडे हस्तांतरित केल्या आहेत. मालमत्तेच्या थकबाकीपोटी ६ कोटी २० लाखांचा ३० जूनचा धनादेश महापालिकेकडे सुपूर्द केला आहे.