शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

क्लृप्त्या लढवूनही करवसुली असमाधानकारकच!

By admin | Updated: April 4, 2017 04:28 IST

केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी विविध क्लृप्त्या लढवूनही महापालिकेकडून समाधानकारक वसुली झालेली नाही

कल्याण : जास्तीतजास्त करवसुली व्हावी, यासाठी केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी विविध क्लृप्त्या लढवूनही महापालिकेकडून समाधानकारक वसुली झालेली नाही. उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट ५२२ कोटी रुपये इतके देण्यात आले होते. परंतु, महापालिकेकडून केवळ ३१४ कोटी १७ लाखांची वसुली झाली आहे. मागील वर्षापेक्षा यंदा केलेल्या वसुलीचा आकडा सर्वाधिक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, करवसुलीत ‘ब’ प्रभाग अव्वल ठरला असून त्यात ८९ कोटी ८५ हजार रुपयांची करवसुली झाली आहे. १ एप्रिल ते ३१ मार्चदरम्यान केडीएमसीच्या महासभेने मालमत्ता, पाणीपट्टी आणि अन्य करवसुलीद्वारे ७७८ कोटी १८ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. मालमत्ताकर ५२२ कोटी ९ लाख, पाणीबिलवसुलीचे ८६ कोटी ९ लाख, तर अन्य कराच्या माध्यमातून १२० कोटींचे लक्ष प्रशासनाला देण्यात आले होते. यात मालमत्ताकरापोटी ३१४ कोटी १७ लाख, पाणीबिलापोटी ५५ कोटी ५७ लाख, तर नगररचना विभागाने नगररचना फी शुल्कापोटी १०९ कोटी ६० लाख रुपये कराची वसुली केली आहे. करवसुलीची टक्केवारी पाहता संपूर्ण करवसुली ६१.४४ टक्के झाली आहे. यात मालमत्ताकर ५९. ९० टक्के, पाणीबिल ६४.८३ टक्के आणि विशेष अधिनियमातील वसुली ९१.३३ टक्के झाली आहे. मागील वर्षी मालमत्ताकरापोटी २६६ कोटी २६ लाख रुपये वसुली झाली होती. यंदा ती ३१४ कोटी १७ लाख झाल्याने ती समाधानकारक व चांगली झाली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. करवसुलीसाठी रवींद्रन यांनी विविध क्लृप्त्या लढवल्या होत्या. यात थकबाकीदारांविरोधात कठोर केलेल्या कारवाईत मालमत्ता जप्त करणे, नळजोडण्या खंडित करणे, थकबाकीदारांच्या आवारात कचरा टाकणे, कचरा न उचलणे, त्यांच्या आवारात कचराकुंडी ठेवणे, अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या होत्या. वर्षभरात मालमत्ताकरापोटी ३१४ कोटी १७ लाख वसूल केले असले, तरी ३१ मार्चला अखेरच्या दिवशी २१ कोटी २० लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. आयुक्तांनी करवसुलीत टाळाटाळ करणाऱ्या काही कर्मचारी आणि करअधीक्षकांवर निलंबन कारवाईचा बडगाही उगारला होता. याउपरही करवसुली समाधानकारक झालेली नसल्याचे वास्तव आहे. करवसुलीत ‘ब’ प्रभाग अव्वल ठरला आहे. या प्रभागात मालमत्ताकरातून ८९ कोटी ८५ हजार ६६२ रुपयांची, तर पाणीबिलापोटी ८ कोटी ६० लाख १५ हजार ५५७ रुपयांची वसुली झाली आहे. त्याखालोखाल ‘क’ प्रभागाची वसुली झाली आहे. या प्रभागातून मालमत्ताकरापोटी ४१ कोटी आणि पाणीपट्टी पाच कोटी ७६ लाखांची वसुली झाली आहे. २७ गावांच्या ‘ई’ प्रभाग कार्यालयाने मालमत्ताकराचे १० कोटी ९१ लाख आणि पाणीपट्टीचे ७ कोटी ७२ लाख रुपये वसूल केले आहेत. (प्रतिनिधी)>५०३ मालमत्ता जप्त केडीएमसीने केलेल्या कारवाईअंतर्गत ५०३ मालमत्ता जप्त केल्या असून २१ मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. आंबिवली येथील नेपच्यून बिल्डर्सचे कार्यालय सील केले होते. त्यानंतर, या विकासकाने २१ सदनिका महापालिकेकडे हस्तांतरित केल्या आहेत. मालमत्तेच्या थकबाकीपोटी ६ कोटी २० लाखांचा ३० जूनचा धनादेश महापालिकेकडे सुपूर्द केला आहे.