शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘टॅमी फ्लू’ औषधाचा दुष्काळ

By admin | Updated: September 7, 2014 00:56 IST

ढगाळ वातावरणामुळे स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. एकट्या मेडिकलमध्ये मागील महिन्यात दोन जणांचा मृत्यू तर सहावर जण पॉझिटिव्ह आले आहेत. यातच संशयित रुग्णांचीही संख्या वाढत असतानाच

‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण अडचणीत : दुकानातही तुटवडानागपूर : ढगाळ वातावरणामुळे स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. एकट्या मेडिकलमध्ये मागील महिन्यात दोन जणांचा मृत्यू तर सहावर जण पॉझिटिव्ह आले आहेत. यातच संशयित रुग्णांचीही संख्या वाढत असतानाच शासकीय रुग्णालयांसोबतच औषधे दुकानांमध्ये या संसर्गजन्य रोगावरील औषधांचा दुष्काळ पडला आहे. गणेशोत्सवात होणाऱ्या गर्दीमुळे स्वाईन फ्लूच्या ‘एच १एन १’ विषाणूंचा संसर्ग वाढण्याचा धोकाही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. राज्यात २००९ मध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तेव्हापासून सार्वजनिक आरोग्य विभाग या रोगावर रामबाण ठरलेले ‘टॅमी फ्लू’ औषध सर्व शासकीय रुग्णालयांत मागणीनुसार पाठवित होते. परंतु मागे पाठविण्यात आलेल्या या औषधांच्या साठ्यांची मुदत ३१ आॅगस्ट रोजीच संपली. सर्वच शासकीय रुग्णालयांनी नवीन साठ्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविला. परंतु अद्यापही औषधे उपलब्ध झालेली नाही. शहरात स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशी स्वाईन फ्लूची लक्षणे असलेला रु ग्णही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. औषधेच नसल्याने अशा रुग्णांवर उपचार कसा करावा, या अडचणीत मेडिकलचे डॉक्टर सापडले आहेत. विशेष म्हणजे, हे औषध रुग्णांना बाहेरून विकत घेण्यास सांगितले जात आहे. परंतु बाहेर एका गोळीची किमत ३५० ते ४०० रुपये आहे. यामुळे सामान्य रुग्ण औषधापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. मेडिकलच्या औषधी विभागाने यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांना पत्र दिले आहे. काही औषध निर्माण कंपन्यांशीही बोलणी केली, परंतु त्यांनीही हातवर केले आहे. शहरातही अनेक औषध दुकानात ‘टॅमी फ्लू’ नाही. ज्यांच्याकडे औषधे उपलब्ध आहे ती खरेदी करणे गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहे. यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)