शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

गवई, आंबेडकरांशी चर्चा करणार

By admin | Updated: August 30, 2015 02:44 IST

गटातटांत विभागून न राहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील एकच रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे, असे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष खासदार रामदास आठवले

अकोला : गटातटांत विभागून न राहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील एकच रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे, असे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी शुक्रवारी व्यक्त केले. रिपब्लिकन ऐक्य केवळ बौद्ध समाजाचे न होता सर्व समाजांचे झाले पाहिजे, असे सांगत रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण राजेंद्र गवई व अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त अकोला दौऱ्यावर आले असता रामदास आठवले पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सध्या शासनाकडून प्रत्येकी एक लाखाची मदत दिली जाते, मात्र ही मदत अत्यंत कमी आहे. त्यांना किमान १५ लाखांची मदत देण्यात यावी, अशी मागणी करतानाच यासाठी मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यासाठी शासनाने कार्यक्रम राबवून आंतरजातीय विवाह करणाऱ्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजाला आरक्षण मिळावे, अशी आमची भूमिका असून, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय उशिराने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जातीला आरक्षण देण्यात यावे, मात्र हे आरक्षण देताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता निर्णय घेण्यात यावा. आरक्षण सर्वांनाच हवे आहे. त्यासाठी संसदेने कायदा करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची गरज!विदर्भात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज योग्य प्रमाणात दिले जात नाही. त्यामुळे विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची गरज असल्याचे खा. आठवले यांनी सांगितले. विदर्भाने मुंबईवर विसंबून राहणे चालणार नाही. याबाबत केंद्र सरकारने विचार करावा. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.