शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचा मान वाढवण्यासाठी पावले उचला - हायकोर्ट

By admin | Updated: December 4, 2015 01:57 IST

शेतामध्ये काम करण्याऐवजी लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. हे रोखण्यासाठी शेती व्यवसाय हा मानाचा ठरेल, अशी पावले उचला. ‘ग्रामपूरक’ धोरण आखा,

मुंबई : शेतामध्ये काम करण्याऐवजी लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. हे रोखण्यासाठी शेती व्यवसाय हा मानाचा ठरेल, अशी पावले उचला. ‘ग्रामपूरक’ धोरण आखा, अशी सूचना गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. बीडमध्ये हे प्रमाण जास्त असल्याने उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत ‘सू-मोटो’ दाखल करून घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठापुढे होती. ‘प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची वेळ आता आली आहे. राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी. शेतकी व्यवसाय राज्यातील मानाचा व्यवसाय ठरेल, यादृष्टीने सरकारने ठोस पावले उचलावीत,’ असे खंडपीठाने म्हटले. ‘राज्य सरकारने ‘ग्रामपूरक’ धोरण आखावे. गावातील तरुण रोजगारासाठी शहराकडे वळण्याऐवजी ते गावातच शेतकी व्यवसाय करण्याकरिता प्रोत्साहित होतील, असे सरकारचे धोरण असले पाहिजे. त्याशिवाय ओला किंवा कोरडा दुष्काळ पडल्यास त्याकरिता आपत्कालीन धोरण आखण्याचाही विचार राज्य सरकारने करावा,’ अशीही सूचना खंडपीठाने राज्य सरकारला केली. शेतकऱ्यांचा ग्रुप इन्शुरन्स काढण्याचा विचारही राज्य सरकारने करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)सूचनांचा अहवाल द्याआत्तापर्यंत न्यायालयाने केलेल्या सर्व सूचनांचा अहवाल तयार करून तो राज्य सरकारपुढे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांना दिले.