शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शेतीचा मान वाढवण्यासाठी पावले उचला - हायकोर्ट

By admin | Updated: December 4, 2015 01:57 IST

शेतामध्ये काम करण्याऐवजी लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. हे रोखण्यासाठी शेती व्यवसाय हा मानाचा ठरेल, अशी पावले उचला. ‘ग्रामपूरक’ धोरण आखा,

मुंबई : शेतामध्ये काम करण्याऐवजी लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. हे रोखण्यासाठी शेती व्यवसाय हा मानाचा ठरेल, अशी पावले उचला. ‘ग्रामपूरक’ धोरण आखा, अशी सूचना गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. बीडमध्ये हे प्रमाण जास्त असल्याने उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत ‘सू-मोटो’ दाखल करून घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठापुढे होती. ‘प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची वेळ आता आली आहे. राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी. शेतकी व्यवसाय राज्यातील मानाचा व्यवसाय ठरेल, यादृष्टीने सरकारने ठोस पावले उचलावीत,’ असे खंडपीठाने म्हटले. ‘राज्य सरकारने ‘ग्रामपूरक’ धोरण आखावे. गावातील तरुण रोजगारासाठी शहराकडे वळण्याऐवजी ते गावातच शेतकी व्यवसाय करण्याकरिता प्रोत्साहित होतील, असे सरकारचे धोरण असले पाहिजे. त्याशिवाय ओला किंवा कोरडा दुष्काळ पडल्यास त्याकरिता आपत्कालीन धोरण आखण्याचाही विचार राज्य सरकारने करावा,’ अशीही सूचना खंडपीठाने राज्य सरकारला केली. शेतकऱ्यांचा ग्रुप इन्शुरन्स काढण्याचा विचारही राज्य सरकारने करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)सूचनांचा अहवाल द्याआत्तापर्यंत न्यायालयाने केलेल्या सर्व सूचनांचा अहवाल तयार करून तो राज्य सरकारपुढे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांना दिले.