शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पर्यावरणाची काळजी घ्या

By admin | Updated: September 27, 2015 05:16 IST

ध्वनिक्षेपकाच्या जोडीने कार्यकर्त्यांच्या गाड्या, त्यांचे कर्कश हॉर्न, ध्वनिक्षेपकावरून लावली जाणारी मोठ्या आवाजातील गाणी

ध्वनिक्षेपकाच्या जोडीने कार्यकर्त्यांच्या गाड्या, त्यांचे कर्कश हॉर्न, ध्वनिक्षेपकावरून लावली जाणारी मोठ्या आवाजातील गाणी, गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेताना कर्कश आवाजातील वाद्ये, ढोल, ताशे हे ढकलगाडीवरून वा ट्रकमधून नेल्या जातात. रस्ताभर सगळ््यांनाच त्रास होतो तो वेगळाच.णपती विसर्जन करताना काळजी घ्यायला हवी. काही प्रांतांम्ये घरातच बादलीभर पाणी घेतात आणि त्यात मूर्ती विसर्जित करतात. ते पाणी बागेमध्ये झाडांना घातले जाते. निर्माल्य खड्डा खणून त्यात घालतात. त्याचे उत्तम खत तयार होते. तेही झाडांनाच घालतात. ज्यांच्या घरामागे विहिरी आहेत ते विहिरीत मूर्तींचे विसर्जन करतात (ते करताना फक्त मूर्तींचे रंग त्रासदायक नाहीत ना हे पाहावे.) गावामध्ये बरीच तळी, तलाव असतात. तेथे त्या तलावांमध्ये मूर्तीविसर्जन केले जाते. नदी असेल तर नदीवर, खाडी, समुद्र जवळ असेल तर त्या ठिकाणी मूर्तींचे विसर्जन होते.या कोणत्याही ठिकाणी विसर्जन करताना काळजी घ्यावी. मूर्तींची संख्या आणि तलावांची खोली, प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती तलाव उथळ बनवतात. तळाशी प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा ढीग जमतो. काही वर्षांतच ते तलाव निरुपयोगी ठरू शकतात. नदी, विहिरी, तलावात शाडूच्या मूर्तींचे विसर्जन करावे. मूर्तींच्या रंगामुळे पाणी प्रदूषित होऊन पाण्यातील मासे, जलचर प्राणी, वनस्पती यांच्यावर विपरीत परिणाम होतो. निर्माल्य पाण्याजवळ काठावर टाकले तरी तेथे ते कुजते व पाण्याला दुर्गंधी येऊ शकते. प्लॅस्टिकच्या पिशव्या पाण्यात पडल्यावर त्याचा जलचरांवर वाईट परिणाम होऊ शकतो. पाणी प्यायला येणाऱ्या प्राण्यांच्या पोटातही या पिसव्या जाऊ शकतात. यासाठी निर्माल्य टाकण्यासाठी मोठमोठे रांजण, कलश ठेवावेत. -----अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे होणारे विसर्जन पाहता मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुुकीचे नियोजन आखले आहे. -------चौपाट्या, तळ््यांवरची गर्दी कमी होईल. पाच फुट उंचीच्या कृत्रिम तलावात ४0 ते ५0 मूर्तींचे विसर्जन सहजतेने करता येते. ज्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत त्या बाजूला करून नंतर समुद्रात खोलवर विसर्जन करावे. ----------सर्वांना त्यामध्येच निर्माल्य टाकण्याची सक्ती करावी. जमा झालेल्या निर्माल्याचे उत्तम खत तयार करून गावातल्या शेतीसाठी, झाडांसाठी वापरावे. प्रत्येक विभागात कृत्रिम विहिरी तयार कराव्यात, म्हणजे त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही. -------ध्वनिप्रदूषणाचा त्रास वाढवण्याऐवजी लेजीमचे ग्रुप असावेत. प्रत्येक गल्लीमध्ये स्वतंत्र गणेशोत्सव मंडळ, त्यांचा स्वतंत्र ध्वनिक्षेपक यामुळे आवाजाची पातळी 90-110 डेसिबल्सच्या घरात जाते. जी 45-65पर्यंत असायला हवी. किंबहुना त्यापेक्षाही कमी असावी. --------मदतीसाठी गृहरक्षक दलाचे २५0 जवान, ५४ वाहतूकरक्षक, राष्ट्रीय छात्र सेनेचे ४00 विद्यार्थी, जल सुरक्षा दलाचे ५00 स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे ९00 विद्यार्थी, सशस्त्र पोलीस दलाचे १00 जवान असतील.