शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कांदा साठेबाजांवर कारवाई करा

By admin | Updated: June 28, 2014 00:48 IST

व्यापारी आणि एपीएमसी मधील अधिका-यांच्या साटेलोटय़ामुळे कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही कांद्याचे भाव कडाडले आहेत.

मुंबई :  व्यापारी आणि एपीएमसी मधील अधिका-यांच्या साटेलोटय़ामुळे कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही कांद्याचे भाव कडाडले आहेत. या प्रकरणी 
राज्य शासनाने तातडीने लक्ष 
घालून साठेबाजांवर कडक द्य
कारवाई करावी, अशी मागणी 
विधान परिषद विरोधी पक्षनेते 
विनोद तावडे यांनी आज पत्र परिषदेत केली.
 सध्या बाजारात उपलब्ध असलेला कांदा हा नुकत्याच संपलेल्या हंगामातील आहे. त्यामुळे लांबलेल्या मान्सूनचा बाजारपेठेतील कांद्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. केवळ साठेबाजांनी कृत्रिम टंचाई निर्माण केल्यामुळे कांद्याची भाववाढ होत आहे. त्यामुळे या साठेबाजांवर तात्काळ कारवाई करण्याची 
मागणी आपण मुख्यमंत्नी पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे लेखी पत्र 
पाठवून केली आहे, असे तावडे यांनी सांगितले.
यापूर्वीही अनेकवेळा कांद्याची भाववाढ झाली. अशा प्रसंगी राज्य सरकारने पूर्वीच्या युपीए सरकारला काही सूचना केल्या असतील अथवा केंद्राने काही विशेष उपाय योजले असतील, तर त्याची माहिती 
द्यावी. जेणोकरून केंद्र सरकारशी 
योग्य समन्वय साधता येईल आणि राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी व सामान्य जनतेवर अन्याय होणार 
नाही यासाठी प्रयत्न करता येईल, असे आपण मुख्यमंत्र्यांना दिलेल्या 
पत्रत नमूद केल्याची माहिती तावडे यांनी दिली. 
(प्रतिनिधी)
 
शशिकांत शिंदे यांचा राजीनामा घ्या
एपीएमसी संचालकांच्या निर्णयामुळे 138 कोटी रूपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी पणन संचालकांनी ठपका ठेवलेले एपीएमसीचे संचालक 
आणि राज्याचे जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्याविरुध्द तातडीने 
फौजदारी कारवाई करण्याची मागणी तावडे यांनी  केली.एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या पणन महासंचालकांच्या आदेशाला कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्थगिती दिली आहे. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा हा प्रकार असून या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.