शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: October 19, 2016 03:53 IST

शासकीय कार्यालयात साजरी करण्याचा शासकीय अध्यादेश असतांनाही त्याचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

ठाणे : आदिवासी कोळी समाजाचे श्रद्धास्थान असलेले आद्य पुरूष रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषींची जयंती राज्यात सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्याचा शासकीय अध्यादेश असतांनाही त्याचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी यांनी केली आहे. ते वाल्हे, येथील संजीवन समाधी स्थळी महर्षी वाल्मिकी ऋषींच्या जयंतीनिमित्त आयोजित कोळी समाजाच्या मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.ते म्हणाले की, राज्यातील खऱ्या आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमात बांधवांना बोगस ठरविणारे आदिवासींचे तथाकथित नेते मधुकर पिचड यांनी तमाम आदिवासी बांधवांना उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांचा शाप लागल्याने पिचडांचे जातप्रमाणपत्र बोगस ठरले. न्यायालयाने जो न्याय पिचडांना दिला तोच न्याय तमाम आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमात बांधवांनाही द्यावा, जात पडताळणी समितीने जे निकष मधुकर पिचडांना लावले तेच निकष आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमात बांधवांना लावावे. तसेच मधुकर पिचडांची पेन्शन तातडीने थांबवून त्यांचा मुलगा आमदार वैभव पिचड याचीदेखील आमदारकी रद्द करावी. याप्रसंगी कार्यक्रमाला वाल्हे गावचे सरपंच कल्पना गोळे, उपसरपंच पोपटराव पवार, पीडीसीसी बँक पुण्याचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, तात्यासाहेब वांभिरे, तसेच महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सचिव मदन भोई, मराठवाडा प्रमुख सिद्धेश्वर कोळी, सुधाकर सुसलादी, महेंद्र कोळी, अनिल कोळी, दीपक भोईर, शाहीर अर्जुन अटाळीकर, किशोर पाटील, पी. व्हाय. कोळी, भारती कोळी, डी.एम. कोळी, समीर सागर, श्री. एकवीरा देवस्थान ट्रस्टचे संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, काळुराम देशमुख, विलास कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते. जयंती व मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र कोळी समाज संघाचे उपाध्यक्ष अरविंद चिव्हे, प्रल्हाद कदम, मल्हारी माने, अतुल चिव्हेंनी परिश्रम केले.(वार्ताहर)> महादेव कोळी प्रमाणपत्राबाबत होणार बैठकराज्याचे जलसंपदामंत्री विजय बापू शिवतारे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, आदिवासी महादेव कोळी समाजाच्या जातप्रमाणपत्राबाबात महिन्याभरात आदिवासी विकास मंत्र्यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करून कोळी बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन. तसेच कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या वाल्हे परिसराला चांगल्या सोई-सुविधा देण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध करून देईन.>श्री क्षेत्र वाल्हे देवस्थानाचा होणार विकास,श्री क्षेत्र वाल्हे देवस्थानला शासनाचा क वर्गाचा दर्जा प्राप्त आहे. परंतु शासकीय सुधारणा मात्र काहीच होत नाही. तरी त्याला ब दर्जा देऊन सोई सुविधा करून वाल्मिकी ऋषींचे भव्य स्मारक व्हावे रामनवमीला सुट्टी मिळते पण ज्यांनी रामायण लिहिले त्या वाल्मिकी ऋषींच्या जयंतीला सुट्टी मिळत नसल्याची खंत जाहीर करून वाल्मिकी जयंती दिवशी शासकीय सण साजरा करून शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.