शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: October 19, 2016 03:53 IST

शासकीय कार्यालयात साजरी करण्याचा शासकीय अध्यादेश असतांनाही त्याचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

ठाणे : आदिवासी कोळी समाजाचे श्रद्धास्थान असलेले आद्य पुरूष रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषींची जयंती राज्यात सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्याचा शासकीय अध्यादेश असतांनाही त्याचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी यांनी केली आहे. ते वाल्हे, येथील संजीवन समाधी स्थळी महर्षी वाल्मिकी ऋषींच्या जयंतीनिमित्त आयोजित कोळी समाजाच्या मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.ते म्हणाले की, राज्यातील खऱ्या आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमात बांधवांना बोगस ठरविणारे आदिवासींचे तथाकथित नेते मधुकर पिचड यांनी तमाम आदिवासी बांधवांना उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांचा शाप लागल्याने पिचडांचे जातप्रमाणपत्र बोगस ठरले. न्यायालयाने जो न्याय पिचडांना दिला तोच न्याय तमाम आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमात बांधवांनाही द्यावा, जात पडताळणी समितीने जे निकष मधुकर पिचडांना लावले तेच निकष आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमात बांधवांना लावावे. तसेच मधुकर पिचडांची पेन्शन तातडीने थांबवून त्यांचा मुलगा आमदार वैभव पिचड याचीदेखील आमदारकी रद्द करावी. याप्रसंगी कार्यक्रमाला वाल्हे गावचे सरपंच कल्पना गोळे, उपसरपंच पोपटराव पवार, पीडीसीसी बँक पुण्याचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, तात्यासाहेब वांभिरे, तसेच महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सचिव मदन भोई, मराठवाडा प्रमुख सिद्धेश्वर कोळी, सुधाकर सुसलादी, महेंद्र कोळी, अनिल कोळी, दीपक भोईर, शाहीर अर्जुन अटाळीकर, किशोर पाटील, पी. व्हाय. कोळी, भारती कोळी, डी.एम. कोळी, समीर सागर, श्री. एकवीरा देवस्थान ट्रस्टचे संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, काळुराम देशमुख, विलास कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते. जयंती व मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र कोळी समाज संघाचे उपाध्यक्ष अरविंद चिव्हे, प्रल्हाद कदम, मल्हारी माने, अतुल चिव्हेंनी परिश्रम केले.(वार्ताहर)> महादेव कोळी प्रमाणपत्राबाबत होणार बैठकराज्याचे जलसंपदामंत्री विजय बापू शिवतारे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, आदिवासी महादेव कोळी समाजाच्या जातप्रमाणपत्राबाबात महिन्याभरात आदिवासी विकास मंत्र्यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करून कोळी बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन. तसेच कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या वाल्हे परिसराला चांगल्या सोई-सुविधा देण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध करून देईन.>श्री क्षेत्र वाल्हे देवस्थानाचा होणार विकास,श्री क्षेत्र वाल्हे देवस्थानला शासनाचा क वर्गाचा दर्जा प्राप्त आहे. परंतु शासकीय सुधारणा मात्र काहीच होत नाही. तरी त्याला ब दर्जा देऊन सोई सुविधा करून वाल्मिकी ऋषींचे भव्य स्मारक व्हावे रामनवमीला सुट्टी मिळते पण ज्यांनी रामायण लिहिले त्या वाल्मिकी ऋषींच्या जयंतीला सुट्टी मिळत नसल्याची खंत जाहीर करून वाल्मिकी जयंती दिवशी शासकीय सण साजरा करून शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.