शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

सिरींजचा कचरा रस्त्यावर

By admin | Updated: September 19, 2014 00:59 IST

जैविक कचऱ्यातून आजाराचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यातील वस्तू पुन्हा वापरल्या जाण्याचा धोका सर्वात जास्त असतो. म्हणून शासकीय व खासगी इस्पितळांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट

दोन लाख रुग्ण वापरतात इन्सुलिनचे इंजेक्शनसुमेध वाघमारे - नागपूरजैविक कचऱ्यातून आजाराचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यातील वस्तू पुन्हा वापरल्या जाण्याचा धोका सर्वात जास्त असतो. म्हणून शासकीय व खासगी इस्पितळांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र घराघरांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याचे काय, याबाबत अद्यापही प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र आहे. शहरात सध्याच्या घडीला सुमारे दोन लाख रुग्ण इंजेक्शनमधून इन्सुलिन घेतात. यांचा दरदिवशीचा दीड लाखांच्यावर इंजेक्शन सिरींज कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. हा कचरा उचलणाऱ्यांचे आणि ते हाताळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जैविक घनकचरा आरोग्याला घातक ठरू शकतो. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्याचे नियम प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिले आहेत. शहरातील बहुसंख्य इस्पितळे याचे कठोरतेने पालनही करतात. रु ग्णालयातील खाटांप्रमाणे महापालिका जैविक कचऱ्यासाठी दर आकारते. याचे कंत्राट ‘सुपर हायजेनिक’ या एजन्सीला देण्यात आले आहे. ही एजन्सी दवाखान्यांमधील जैविक, वैद्यकीय कचरा जमा करून त्याच्यावर प्रक्रि या करण्याचे काम करते. परंतु अनेक घरांमध्ये काही विविध कामानिमित्त वापरण्यात आलेले कॉटन, इंजेक्शनच्या सिरींज या थेट सामान्य कचऱ्यात टाकल्या जात आहे. यात इन्सुलिनचा वापर करणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वात अधिक आहे. बदलती जीवनशैली आणि आहार यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डॉक्टरांची जबाबदारी डॉक्टर रुग्णांना इन्सुलिन घेण्यास सांगतात. त्यामुळे ही जबाबदारी डॉक्टरांची आहे. रुग्ण किती इन्सुलिन घेतो याची माहिती संबंधित डॉक्टरांकडेच असते. यामुळे डॉक्टरांनी ही खबरदारी घ्यायला हवी. सध्यातरी कचऱ्यातील इंजेक्शन टोचल्यामुळे कुठला कर्मचारी गंभीर झाल्याची घटना नाही. -डॉ. मिलिंद गणवीरउपसंचालक, आरोग्य विभाग मनपा.कचऱ्यातील सिरींजमुळे आणखी धोका वाढतोशहरात साधारण दोन लाख लोक इन्सुलिनचा वापर करतात. या रुग्णांना आपला जैविक कचरा स्वत:च हाताळावा लागतो. डॉक्टर हा कचरा आपल्याकडे जमा करण्याचा सूचना देत असले तरी अनेक रुग्णांना ते शक्य होत नाही. यामुळे घराघरांतून निघणाऱ्या कचऱ्यात हा कचरा जातो. परिणामी याचा धोका वाढतो. हेपेटायटिस बी, एचआयव्ही पुरताचा हा धोका राहत नाही तर यापेक्षाही गंभीर आजार होण्याची भीती असते.-डॉ. सुरेश अग्रवाल