शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सिरींजचा कचरा रस्त्यावर

By admin | Updated: September 19, 2014 00:59 IST

जैविक कचऱ्यातून आजाराचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यातील वस्तू पुन्हा वापरल्या जाण्याचा धोका सर्वात जास्त असतो. म्हणून शासकीय व खासगी इस्पितळांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट

दोन लाख रुग्ण वापरतात इन्सुलिनचे इंजेक्शनसुमेध वाघमारे - नागपूरजैविक कचऱ्यातून आजाराचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यातील वस्तू पुन्हा वापरल्या जाण्याचा धोका सर्वात जास्त असतो. म्हणून शासकीय व खासगी इस्पितळांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र घराघरांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याचे काय, याबाबत अद्यापही प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र आहे. शहरात सध्याच्या घडीला सुमारे दोन लाख रुग्ण इंजेक्शनमधून इन्सुलिन घेतात. यांचा दरदिवशीचा दीड लाखांच्यावर इंजेक्शन सिरींज कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. हा कचरा उचलणाऱ्यांचे आणि ते हाताळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जैविक घनकचरा आरोग्याला घातक ठरू शकतो. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्याचे नियम प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिले आहेत. शहरातील बहुसंख्य इस्पितळे याचे कठोरतेने पालनही करतात. रु ग्णालयातील खाटांप्रमाणे महापालिका जैविक कचऱ्यासाठी दर आकारते. याचे कंत्राट ‘सुपर हायजेनिक’ या एजन्सीला देण्यात आले आहे. ही एजन्सी दवाखान्यांमधील जैविक, वैद्यकीय कचरा जमा करून त्याच्यावर प्रक्रि या करण्याचे काम करते. परंतु अनेक घरांमध्ये काही विविध कामानिमित्त वापरण्यात आलेले कॉटन, इंजेक्शनच्या सिरींज या थेट सामान्य कचऱ्यात टाकल्या जात आहे. यात इन्सुलिनचा वापर करणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वात अधिक आहे. बदलती जीवनशैली आणि आहार यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डॉक्टरांची जबाबदारी डॉक्टर रुग्णांना इन्सुलिन घेण्यास सांगतात. त्यामुळे ही जबाबदारी डॉक्टरांची आहे. रुग्ण किती इन्सुलिन घेतो याची माहिती संबंधित डॉक्टरांकडेच असते. यामुळे डॉक्टरांनी ही खबरदारी घ्यायला हवी. सध्यातरी कचऱ्यातील इंजेक्शन टोचल्यामुळे कुठला कर्मचारी गंभीर झाल्याची घटना नाही. -डॉ. मिलिंद गणवीरउपसंचालक, आरोग्य विभाग मनपा.कचऱ्यातील सिरींजमुळे आणखी धोका वाढतोशहरात साधारण दोन लाख लोक इन्सुलिनचा वापर करतात. या रुग्णांना आपला जैविक कचरा स्वत:च हाताळावा लागतो. डॉक्टर हा कचरा आपल्याकडे जमा करण्याचा सूचना देत असले तरी अनेक रुग्णांना ते शक्य होत नाही. यामुळे घराघरांतून निघणाऱ्या कचऱ्यात हा कचरा जातो. परिणामी याचा धोका वाढतो. हेपेटायटिस बी, एचआयव्ही पुरताचा हा धोका राहत नाही तर यापेक्षाही गंभीर आजार होण्याची भीती असते.-डॉ. सुरेश अग्रवाल