शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

अरुंधती भट्टाचार्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

By admin | Updated: March 17, 2017 16:11 IST

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांच्याविरोधात अखिल भारतीय छावा संघटनेने आंदोलन केलं.

 ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 17 -  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांच्याविरोधात अखिल भारतीय छावा संघटनेने आंदोलन केलं. काही दिवसांपूर्वी भट्टाचार्य यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीस विरोध दर्शवला होता. शेतक-यांचे कर्जमाफ करणे चुकीचे असल्याचे, त्यांनी म्हटले होते.  त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अकोल्यात अखिल भारतीय छावा संघटनेने भट्टाचार्य यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. 
 
यावेळी ५० हून अधिक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  एका मुलाखतीत भट्टाचार्य यांनी सरकारकडून शेतक-यांना देण्यात येत असलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनांना  यांनी विरोध करणारे वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी असे म्हटले होते की,  'कर्जमाफीमुळे शेतक-यांच्या कजार्ची परतफेड करण्याच्या जबाबदारीवर विपरित परिणाम होतो. तसेच कर्जमाफीमुळे शेतकरी पुन्हा निवडणुका येण्याची वाट पाहतील आणि कजार्ची परतफेड करण्याऐवजी कर्ज माफ होण्याची प्रतीक्षा करतील'.
 
त्यांचे वक्तव्य हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख रणजित काळे, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर पाटील, जिल्हा संघटक प्रमोद देंडवे, आदी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
 
 
तर दुसरीकडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरूंधती भट्टाचार्य यांच्याविरूद्ध विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाची सूचना दिली आहे. भट्टाचार्य यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात प्रसारमाध्यमांकडे जाहीरपणे केलेल्या निवेदनामुळे कायदेमंडळाचा हक्कभंग झाल्याचा आक्षेप विखे पाटील यांनी नोंदवला आहे. 
 
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेत्यांनी नमूद केले आहे की, स्टेट बँकेच्या अध्यक्षांचे विधान कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा, या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आणि सभागृहाचा अवमान आहे. अरूंधती भट्टाचार्य या ‘पॉलिसी मेकर’ नाहीत. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नाही. हा कायदेमंडळाचा अधिकार आहे. भट्टाचार्य यांनी केलेली विधाने घटनेच्या चौकटीबाहेरील व कायदेमंडळाच्या अधिकारांवर गदा आणणारी आहेत. यासंदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी,अशी मागणी आम्ही गुरुवारी केली होती. परंतु,अद्याप त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली नसल्याने हक्कभंगाची सूचना दिल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.