शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

काँग्रेस-भाजपला रोखण्यासाठी ‘झाडू’: मिश्रा

By admin | Updated: November 16, 2015 00:11 IST

‘सत्तेच्या माध्यमातून सहकार व्यवस्था बिघडून गेली आहे.

सातारा : ‘शेतकऱ्यांसाठी सहकार चळवळ उभी केली; पण सध्या छोट्या शेतकऱ्यांसाठी सहकार हा शब्द स्वप्न ठरले आहे. कारण सहकार चळवळ पश्चिम महाराष्ट्रात काही परिवारांची मालमत्ता बनली आहे. त्यासाठी सामान्य घरातील झाडू दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचला. तसेच महाराष्ट्रातही हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपचे संघटन वाढविण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे,’ असे प्रतिपादन ‘आम आदमी’चे महाराष्ट्राचे सहप्रभारी राजीव मिश्रा यांनी केले. सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मिश्रा यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बातचित केली. यावेळी महिला कार्यकर्त्यां आभा मुळे, ‘आप’चे जिल्हा संयोजक एस. आर. भोगावकर, निरस मलिक, विजय यादव, अ‍ॅड. विकास साबळे, अ‍ॅड. इम्तियाज खान, उत्तम सावंत, विजयकुमार धोतमल, अतुल भोसले, विशाल कोळी, कृणाल चिकणे, अ‍ॅड. विजय खामकर आदी मान्यवर उपस्थित होते. मिश्रा म्हणाले, ‘सत्तेच्या माध्यमातून सहकार व्यवस्था बिघडून गेली आहे. सहकारी चळवळीचा वापर स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी होऊ लागला आहे. काही परिवारांची मालमत्ता बनलेल्या साखर कारखाना, सूतगिरणी व इतर संस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारामुळे सामान्य सभासदांना न्याय मागणे कठीण झाले आहे. दहशतवाद व दडपशाही यातून निवडणूक होत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी प्रामाणिक व जागरुक पत्रकारांनी पुढाकार घेऊन सामान्य शेतकऱ्यांना सहकारातील अधिकार मिळवून देण्यासाठी पुढे आले पाहिजे.’‘देशात काँग्रेस व भाजप असे दोन पक्ष सत्ता वाटून घेत होते; परंतु आप पक्षाने लोकांचे प्रश्न हाती घेऊन आंदोलन केले. लोकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे सामान्य घरातील झाडू दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचला. महाराष्ट्रातही हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपचे संघटन वाढविण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. काँग्रेस व भाजप यांना रोखण्याचे काम फक्त आप करू शकतो; कारण जनतेला आता पर्याय हवा आहे. हे दिल्लीतील मतदारांनी दाखवून दिले आहे,’ असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)