शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

काँग्रेस-भाजपला रोखण्यासाठी ‘झाडू’: मिश्रा

By admin | Updated: November 16, 2015 00:11 IST

‘सत्तेच्या माध्यमातून सहकार व्यवस्था बिघडून गेली आहे.

सातारा : ‘शेतकऱ्यांसाठी सहकार चळवळ उभी केली; पण सध्या छोट्या शेतकऱ्यांसाठी सहकार हा शब्द स्वप्न ठरले आहे. कारण सहकार चळवळ पश्चिम महाराष्ट्रात काही परिवारांची मालमत्ता बनली आहे. त्यासाठी सामान्य घरातील झाडू दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचला. तसेच महाराष्ट्रातही हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपचे संघटन वाढविण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे,’ असे प्रतिपादन ‘आम आदमी’चे महाराष्ट्राचे सहप्रभारी राजीव मिश्रा यांनी केले. सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मिश्रा यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बातचित केली. यावेळी महिला कार्यकर्त्यां आभा मुळे, ‘आप’चे जिल्हा संयोजक एस. आर. भोगावकर, निरस मलिक, विजय यादव, अ‍ॅड. विकास साबळे, अ‍ॅड. इम्तियाज खान, उत्तम सावंत, विजयकुमार धोतमल, अतुल भोसले, विशाल कोळी, कृणाल चिकणे, अ‍ॅड. विजय खामकर आदी मान्यवर उपस्थित होते. मिश्रा म्हणाले, ‘सत्तेच्या माध्यमातून सहकार व्यवस्था बिघडून गेली आहे. सहकारी चळवळीचा वापर स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी होऊ लागला आहे. काही परिवारांची मालमत्ता बनलेल्या साखर कारखाना, सूतगिरणी व इतर संस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारामुळे सामान्य सभासदांना न्याय मागणे कठीण झाले आहे. दहशतवाद व दडपशाही यातून निवडणूक होत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी प्रामाणिक व जागरुक पत्रकारांनी पुढाकार घेऊन सामान्य शेतकऱ्यांना सहकारातील अधिकार मिळवून देण्यासाठी पुढे आले पाहिजे.’‘देशात काँग्रेस व भाजप असे दोन पक्ष सत्ता वाटून घेत होते; परंतु आप पक्षाने लोकांचे प्रश्न हाती घेऊन आंदोलन केले. लोकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे सामान्य घरातील झाडू दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचला. महाराष्ट्रातही हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपचे संघटन वाढविण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. काँग्रेस व भाजप यांना रोखण्याचे काम फक्त आप करू शकतो; कारण जनतेला आता पर्याय हवा आहे. हे दिल्लीतील मतदारांनी दाखवून दिले आहे,’ असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)