शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाणीकपातीच्या निर्देशांना स्थगिती

By admin | Updated: October 7, 2015 03:53 IST

भातसा धरणातील पाणीसाठा कमी असल्याने मुंबई आणि ठाणे महापालिकांना ४० टक्के पाणीकपातीच्या राज्य शासनाच्या निर्देशांना मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली.

मुंबई : भातसा धरणातील पाणीसाठा कमी असल्याने मुंबई आणि ठाणे महापालिकांना ४० टक्के पाणीकपातीच्या राज्य शासनाच्या निर्देशांना मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. भातसा धरणातून मुंबई महापालिकेला २१२० दशलक्ष घनमीटर तर ठाणे महापालिकेला २०० दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा होतो. या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे भातसा धरणातील पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे ५ सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने दोन्ही महापालिकांना ४० टक्के पाणीकपात करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात सुमारे १ लाख दशलक्ष लीटर वाढ झाली. तसेच कपातीची सूचना देण्यापूर्वीच मुंबई महापालिकेने २६ आॅगस्टपासून मुंबईत १५ टक्के कपात लागू केली असल्याने या कपातीचा फेरविचार करावा, अशी विनंती महापालिकेने शासनाला केली होती. मात्र त्याबाबत निर्णय न झाल्याने मुंबई भाजपाध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत ४० टक्के कपात लागू करू नये अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ५ सप्टेंबरच्या पत्राला स्थगिती दिली. सध्या मुंबईत १५ टक्के पाणीकपात सुरू असून, त्याबाबत पाणीसाठ्याचा फेरआढावा घेऊन पुढील निर्णय घ्यावा आणि त्याबाबत राज्य शासनाला कळवावे अशी चर्चा या बैठकीत झाली.