शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बहुसदस्यीय पालिका प्रभागांना स्थगिती नाकारली

By admin | Updated: October 25, 2016 01:51 IST

राज्यपालांच्या अध्यादेशाने लागू झालेल्या कायद्याची अंमलबजावणी थांबवू शकत नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील महानगरपालिका

नागपूर : राज्यपालांच्या अध्यादेशाने लागू झालेल्या कायद्याची अंमलबजावणी थांबवू शकत नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील महानगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांसाठीच्या बहुसदस्यीय प्रभाग रचनेस अंतरिम स्थगिती देण्यास सोमवारी नकार दिला.दारव्हा नगर परिषदेचे सदस्य हरिभाऊ गुल्हाने व सईद फारुख सईद करीम आणि नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी यासाठी वेगवेगळ्या रिट याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्या. भूषण गवई व न्या. विनय देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्यपालांना राज्यस्तरावर अध्यादेश जारी करण्याचा अधिकार आहे. परंतु, हा अधिकार कोणत्या परिस्थितीत व कसा वापरायचा यासंदर्भातील विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये सात सदस्यीय घटनापीठासमक्ष प्रलंबित आहे. यामुळे तेथे होणाऱ्या निर्णयाची प्रतिक्षा करण्याचे ठरवून खंडपीठाने कोणताही अंतरिम स्थगिती आदेश न देता या दोन्ही याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतल्या.राज्य शासनाने महानगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यासाठी ७ मे २०१६ रोजी महाराष्ट्र महानगरपालिका कायदा आणि महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक वसाहत कायद्यात दुरुस्ती केली. याविषयी राज्यपालांनी १९ मे २०१६ रोजी पहिला अध्यादेश जारी केला. हा सुधारित कायदा १८ जुलै २०१६ रोजी विधानसभेत पारित झाला. परंतु, या कायद्याला विधान परिषदेची मंजुरी मिळू शकली नाही. दरम्यान, पहिल्या अध्यादेशाची मुदत २८ आॅगस्ट २०१६ रोजी संपली. हा अध्यादेश कायम ठेवण्यासाठी ३० आॅगस्ट २०१६ रोजी दुसरा अध्यादेश जारी करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाने या अध्यादेशानुसार १७ आॅक्टोबर २०१६ रोजी आदेश जारी करून निवडणूक कार्यक्रम घोषित केला.राज्यपालांचा दुसरा अध्यादेश अवैध आहे. परिणामी निवडणूक आयोगाचा आदेशही अवैध ठरतो. हा अध्यादेश व आदेश रद्द करण्यात यावा असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.एका प्रभागात अनेक नगरसेवकअध्यादेशानुसार महानगरपालिकेच्या प्रभागात किमान तीन व कमाल चार तर, नगर परिषदेच्या प्रभागात किमान दोन व कमाल तीन उमेदवार उभे राहू शकतात. यावेळी नगर परिषद अध्यक्षाची निवड थेट निवडणुकीतून करण्यात येणार आहे.