शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

सुरेशदादा जैन यांचा जामीन अर्ज रद्द

By admin | Updated: August 5, 2014 02:58 IST

16 दिवसांचा दिलेला तात्पुरता जामीन निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे यांनी रद्द केला.

औरंगाबाद : जळगाव येथील घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेशदादा जैन यांना धुळे येथील विशेष न्यायालयाने 16 दिवसांचा दिलेला तात्पुरता जामीन निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे यांनी रद्द केला.
 जळगाव येथील घरकुल घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुरेशदादा जैन यांना धुळे येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर.कदम यांनी 17 जुलै रोजी 16 दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केला होता. या निर्णयास सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र भास्कर पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल करून आव्हान दिले होते. या अर्जावर 1 ऑगस्ट रोजी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती टी.व्ही.नलावडे यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. त्यावेळी अजर्दाराच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की, जामिनासाठी दाखल करण्यात आलेला अर्ज कोणत्याही फौजदारी संहितेनुसार दाखल करण्यात आला नव्हता, तसेच जैन यांचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठासमोर प्रलंबित आहे. असे असताना पुन्हा त्याच मागणीसाठी विशेष न्यायालयासमोर अर्ज करणो अयोग्य आहे. एवढेच नव्हे, तर जैन यांचा यापूर्वी धुळे येथील विशेष न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ तसेच सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेला आहे.
पाटील यांचे असेही म्हणणो होते की,  जैन यांनी तात्पुरता जामीन मिळविताना असत्य माहिती न्यायालयासमोर सादर केल्याचे म्हटले आहे. त्यांना उपचारासाठी आणि मुलाच्या घराच्या वास्तुशांतीसाठी जामीन हवा असल्याचे म्हटले होते; मात्र मेडिकल बोर्डाचे प्रमाणपत्र आणि घराच्या वास्तुशांतीसंदर्भात घर कोणाच्या नावावर आहे, याबाबतची माहिती न्यायालयाकडे सादर केली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना शासकीय रुग्णालयातच आरोग्य सेवा उपलब्ध करावी, असे निर्देशही दिलेले आहेत. भूतकाळातील त्यांचे वर्तन पाहता त्यांना तात्पुरता जामीन देणो चुकीचे ठरेल, आदी मुद्दे उपस्थित केले होते. (प्रतिनिधी)
 
च्उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी निर्णय राखून ठेवला होता. सोमवारी ही याचिका पुन्हा सुनावणीसाठी आली असता न्यायालयाने जैन यांना धुळे येथील विशेष न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्याचा निर्णय दिला. या याचिकेत अजर्दारातर्फे अॅड. प्रवीण चव्हाण, अॅड.सतीश तळेकर, अॅड.प्रसन्ना कुट्टी आणि अॅड.ए.आर.सय्यद यांनी, तर शासनाकडून मुख्य सरकारी वकील सुनील कुरुंदकर यांनी बाजू मांडली.