शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची सीताबर्डी पोलिसांकडून पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2016 05:29 IST

सर्वोच्च न्यायालयाने ‘अर्नेशकुमार वि. बिहार शासन’ प्रकरणात दिलेल्या निर्णयाची सीताबर्डी पोलिसांनी पायमल्ली केली आहे.

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने ‘अर्नेशकुमार वि. बिहार शासन’ प्रकरणात दिलेल्या निर्णयाची सीताबर्डी पोलिसांनी पायमल्ली केली आहे. यामुळे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाचे न्यायाधीश जे. आर. गाडगे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित बंडीवार व तपास अधिकारी के. आर. गवई (पोलीस उपनिरीक्षक) यांना फटकारून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.प्रकरणातील माहितीनुसार, २८ आॅक्टोबर रोजी झांशी राणी चौक येथे सीताबर्डी पोलिसांनी आरोपी हरिश्वर मेंढरे यांच्यावर हेल्मेट घातले नसल्यामुळे कारवाई केली. दरम्यान, मेंढरे व पोलिसांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. हा गोंधळ पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी गोळा झाली होती. यानंतर मेंढरे यांना पोलीस ठाण्यात नेऊन भादंविच्या कलम ३५३, ३३२ व २९४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी एवढ्यावरच न थांबता मेंढरे यांना तत्काळ अटकही केली. परिणामी सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निर्णयाची पायमल्ली झाली. सात वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कारावासाच्या शिक्षेचा गुन्हा असल्यास विशिष्ट कारण नोंदविल्याशिवाय कोणालाही अटक करता येत नाही असे संबंधित निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मेंढरे यांनी केलेल्या गुन्ह्यात केवळ तीन वर्षे कारावासापर्यंतची शिक्षा आहे. असे असताना मेंढरे यांना २८ तारखेचा पूर्ण दिवस व रात्र आणि २९ तारखेचा पूर्ण दिवस कारागृहात घालवावा लागला. जेएमएफसी न्यायालयाने त्यांना मुक्त करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. अभियांत्रिकी पदवीधारक असलेले मेंढरे व्यवसायाने बिल्डर आहेत. मेंढरे यांच्यातर्फे अ‍ॅड. आकाश गुप्ता यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)