शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

दहावी, बारावी नापासांसाठी पुरवणी परीक्षा

By admin | Updated: May 23, 2015 00:26 IST

सरकार विचार करणार : विनोद तावडे यांची माहिती--लोकमतचा पाठपुरावा

चंद्रकांत कित्तुरे - कोल्हापूरदहावी आणि बारावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकप्रमाणे जूनमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याबाबत नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण पाहून विचार करता येईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कर्नाटकात दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च, एप्रिलमध्ये घेतली जाते. तिचा निकाल दीड महिन्याच्या आत लावला जातो. या परीक्षांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जून महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसोबत पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश घेता येतो. जून महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, तरी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागांतून किंवा आवश्यकतेनुसार वाढीव जागा निर्माण केल्या जातात.महाराष्ट्रात मुख्य परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाते. महिन्यानंतर निकाल लागतो. या संपूर्ण प्र्रक्रियेत निम्मे वर्ष जाते. पुढच्या वर्गासाठी प्रवेशाचे दरवाजे बंद होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. मुख्य परीक्षेनंतर सहा महिन्यांनी परीक्षा होत असल्यामुळे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही सरासरी १५ टक्के इतके कमी आहे. कर्नाटकात पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २५ टक्के आहे. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा आधार ठरली आहे. वर्ष वाया जात नसल्यामुळे वैफल्याची भावना येत नाही. पुन्हा जोमाने अभ्यास करून नियमित विद्यार्थ्यांसोबत शिक्षणाचे धडे घेतात. याबाबत ‘लोकमत’ने २४ ते २६ मार्च या काळात तीन भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी कोल्हापुरात आलेल्या तावडे यांच्याकडे ‘लोकमत’ने यासंबंधीची विचारणा केली. त्यावर हा विचार खूप चांगला आहे. राज्यातील नापास विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, याची माहिती घेऊन महाराष्ट्रातही अशी पुरवणी परीक्षा घेता येते का, याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, असे तावडे यांनी सांगितले.