शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

दहावी, बारावी नापासांसाठी पुरवणी परीक्षा

By admin | Updated: May 23, 2015 00:26 IST

सरकार विचार करणार : विनोद तावडे यांची माहिती--लोकमतचा पाठपुरावा

चंद्रकांत कित्तुरे - कोल्हापूरदहावी आणि बारावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकप्रमाणे जूनमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याबाबत नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण पाहून विचार करता येईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कर्नाटकात दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च, एप्रिलमध्ये घेतली जाते. तिचा निकाल दीड महिन्याच्या आत लावला जातो. या परीक्षांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जून महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसोबत पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश घेता येतो. जून महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, तरी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागांतून किंवा आवश्यकतेनुसार वाढीव जागा निर्माण केल्या जातात.महाराष्ट्रात मुख्य परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाते. महिन्यानंतर निकाल लागतो. या संपूर्ण प्र्रक्रियेत निम्मे वर्ष जाते. पुढच्या वर्गासाठी प्रवेशाचे दरवाजे बंद होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. मुख्य परीक्षेनंतर सहा महिन्यांनी परीक्षा होत असल्यामुळे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही सरासरी १५ टक्के इतके कमी आहे. कर्नाटकात पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २५ टक्के आहे. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा आधार ठरली आहे. वर्ष वाया जात नसल्यामुळे वैफल्याची भावना येत नाही. पुन्हा जोमाने अभ्यास करून नियमित विद्यार्थ्यांसोबत शिक्षणाचे धडे घेतात. याबाबत ‘लोकमत’ने २४ ते २६ मार्च या काळात तीन भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी कोल्हापुरात आलेल्या तावडे यांच्याकडे ‘लोकमत’ने यासंबंधीची विचारणा केली. त्यावर हा विचार खूप चांगला आहे. राज्यातील नापास विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, याची माहिती घेऊन महाराष्ट्रातही अशी पुरवणी परीक्षा घेता येते का, याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, असे तावडे यांनी सांगितले.