शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचं संकट हे अस्मानीबरोबरच सुलतानी- मुख्यमंत्री

By admin | Updated: June 15, 2016 18:30 IST

पावसावर अवलंबून असलेली शेती हे अस्मानी नाही तर सुलतानीही संकट आहे

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 15 - पावसावर अवलंबून असलेली शेती हे अस्मानी नाही तर सुलतानीही संकट आहे. या संकटाचे आव्हान मोठे असून त्यांचा सामना करण्यास सरकार पुरेसे पडणार नाही अशावेळी समाजानेही यासाठी पुढे यायला हवे असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्था पुरविण्यात आधीचे सरकार अपयशी ठरले असून येत्या काळात विकेंद्रित पाण्याचे साठे निर्माण करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे असल्याचेही ते म्हणाले. भारतीय जैन संघटनेतर्फे १००० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना वाघोली येथे ते बोलत होते. सध्या राज्यात असणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरतून ७०० विद्यार्थी तर मेळघाट व ठाणे या आदिवासी भागातील ३०० विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे दहावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाणार आहे. याबरोबरच या विद्यार्थ्यांची निवास व भोजनाचीही सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सामाजिक, अर्थिक परिवर्तनासाठी सरकार काम करतच असते. मात्र समाज हा शासन व कायद्यांच्या भरोशावर नाही तर समाजाच्या भरोशावर बदलत असते. जन्माला आलेल्या प्रत्यक व्यक्तीला जगण्याचा अधिकार असून वंचित समाजघटकांची जबाबदारी समाजातील इतर लोकांनी घ्यायला हवी. आत्महत्या होतात त्याबाबत संवेदना जागृत व्हायला हवी मात्र त्याचे उदात्तीकरण व्हायला नको असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.