शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचं संकट हे अस्मानीबरोबरच सुलतानी- मुख्यमंत्री

By admin | Updated: June 15, 2016 18:30 IST

पावसावर अवलंबून असलेली शेती हे अस्मानी नाही तर सुलतानीही संकट आहे

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 15 - पावसावर अवलंबून असलेली शेती हे अस्मानी नाही तर सुलतानीही संकट आहे. या संकटाचे आव्हान मोठे असून त्यांचा सामना करण्यास सरकार पुरेसे पडणार नाही अशावेळी समाजानेही यासाठी पुढे यायला हवे असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्था पुरविण्यात आधीचे सरकार अपयशी ठरले असून येत्या काळात विकेंद्रित पाण्याचे साठे निर्माण करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे असल्याचेही ते म्हणाले. भारतीय जैन संघटनेतर्फे १००० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना वाघोली येथे ते बोलत होते. सध्या राज्यात असणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरतून ७०० विद्यार्थी तर मेळघाट व ठाणे या आदिवासी भागातील ३०० विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे दहावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाणार आहे. याबरोबरच या विद्यार्थ्यांची निवास व भोजनाचीही सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सामाजिक, अर्थिक परिवर्तनासाठी सरकार काम करतच असते. मात्र समाज हा शासन व कायद्यांच्या भरोशावर नाही तर समाजाच्या भरोशावर बदलत असते. जन्माला आलेल्या प्रत्यक व्यक्तीला जगण्याचा अधिकार असून वंचित समाजघटकांची जबाबदारी समाजातील इतर लोकांनी घ्यायला हवी. आत्महत्या होतात त्याबाबत संवेदना जागृत व्हायला हवी मात्र त्याचे उदात्तीकरण व्हायला नको असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.