शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तिनं सांगितलं होतं...!"; सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचं मोठं विधान
2
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
3
₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
4
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
5
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
6
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
7
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
8
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
9
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
10
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
11
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
13
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
14
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
15
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
16
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
17
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
18
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
19
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!

राज्यात आतापर्यंत साडेनऊशे शेतक-यांच्या आत्महत्या!

By admin | Updated: November 23, 2015 01:30 IST

सणासुदीच्या महिन्यात आत्महत्यांचा आकडा पोहोचला ३५ वर.

अकोला : बदलते हवामान आणि सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला असून, सलग दहा वर्षांपासून पीक उत्पादनाचा पैसाच हाती येत नसल्याने राज्यातील कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. यावर्षी जानेवारीपासूनआजमितीस ९५0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. यावर्षी पाऊस नसल्याने राज्यातील खरीप हंगामातील सर्व पिकांचे उत्पादन प्रचंड घटले असून, रब्बी हंगामही हातचा गेला आहे. सलग दहा वर्षांपासून विदर्भातील कृषी विकासाचा दर शून्यावर आहे. शेतकर्‍यांच्या हातात पैसाच नसल्याने या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारा शेतकरी गारद झाला आहे. मागील दहा वर्षांपासून कधी अतवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ या ऋतुचक्रात शेतकरी भरडला आहे. उत्पादन खर्चही शेतीतून निघत नसून, कर्जाचा डोंगर, मुलींचे लग्न, शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह आदींची जुळवाजुळव करताना मेटाकुटीस आलेला शेतकरी मृत्यूला कवटाळीत आहे. यावर्षी यात दुष्काळाची भर पडली आहे. पाऊसच नसल्याने खरिपातील मूग, उडीद पिके हातची गेली. पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनचे उत्पादन एकरी २0 ते ५0 किलोपर्यंतच झाले आहे. मशागत, पेरणी, किडींच्या बदोबस्तासाठी फवारणी ते काढणीपर्यंत खर्च झेपावत नसल्याने शेकडो शेतकर्‍यांनी शेतातून सोयाबीन न काढणेच पसंत केले आहे. कापसाचे चित्रही वाईट असून, जूनमध्ये पेरणी केलेल्या कापसाला ज्या ठिकाणी सिंचनाची सोय होती, तिथे एकरी ३ क्विंटलच्यावर उतारा आहे; परंतु बहुतांश ठिकाणी कापसाचा एकरी उतारा एक ते दोन क्विंटल आहे. संपूर्ण राज्यातीलच चित्र वाईट असल्याने, पैशाअभावी शेतकरी सैरभैर झाला असून, सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. विदर्भात यावर्षी ५८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली असून, या सणासुदीच्या महिन्यात १ ते २२ नोव्हेंबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खान्देशातील ३५ च्यावर शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. राज्यात आतापर्यंत ९५0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. सणासुदीत आत्महत्येचा आकडा वाढला आहे. शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर काढायचे असेल, तर सामाजिक सुरक्षिततेचा उपाय करावा लागणार आहे. दीर्घकालीन योजनांचे नियोजन करण्यास हरकत नाही; परंतु शेतकर्‍यांना सध्या तातडीच्या मदतीची गरज असल्याचे कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर स्पष्ट केले.