शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आतापर्यंत साडेनऊशे शेतक-यांच्या आत्महत्या!

By admin | Updated: November 23, 2015 01:30 IST

सणासुदीच्या महिन्यात आत्महत्यांचा आकडा पोहोचला ३५ वर.

अकोला : बदलते हवामान आणि सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला असून, सलग दहा वर्षांपासून पीक उत्पादनाचा पैसाच हाती येत नसल्याने राज्यातील कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. यावर्षी जानेवारीपासूनआजमितीस ९५0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. यावर्षी पाऊस नसल्याने राज्यातील खरीप हंगामातील सर्व पिकांचे उत्पादन प्रचंड घटले असून, रब्बी हंगामही हातचा गेला आहे. सलग दहा वर्षांपासून विदर्भातील कृषी विकासाचा दर शून्यावर आहे. शेतकर्‍यांच्या हातात पैसाच नसल्याने या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारा शेतकरी गारद झाला आहे. मागील दहा वर्षांपासून कधी अतवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ या ऋतुचक्रात शेतकरी भरडला आहे. उत्पादन खर्चही शेतीतून निघत नसून, कर्जाचा डोंगर, मुलींचे लग्न, शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह आदींची जुळवाजुळव करताना मेटाकुटीस आलेला शेतकरी मृत्यूला कवटाळीत आहे. यावर्षी यात दुष्काळाची भर पडली आहे. पाऊसच नसल्याने खरिपातील मूग, उडीद पिके हातची गेली. पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनचे उत्पादन एकरी २0 ते ५0 किलोपर्यंतच झाले आहे. मशागत, पेरणी, किडींच्या बदोबस्तासाठी फवारणी ते काढणीपर्यंत खर्च झेपावत नसल्याने शेकडो शेतकर्‍यांनी शेतातून सोयाबीन न काढणेच पसंत केले आहे. कापसाचे चित्रही वाईट असून, जूनमध्ये पेरणी केलेल्या कापसाला ज्या ठिकाणी सिंचनाची सोय होती, तिथे एकरी ३ क्विंटलच्यावर उतारा आहे; परंतु बहुतांश ठिकाणी कापसाचा एकरी उतारा एक ते दोन क्विंटल आहे. संपूर्ण राज्यातीलच चित्र वाईट असल्याने, पैशाअभावी शेतकरी सैरभैर झाला असून, सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. विदर्भात यावर्षी ५८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली असून, या सणासुदीच्या महिन्यात १ ते २२ नोव्हेंबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खान्देशातील ३५ च्यावर शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. राज्यात आतापर्यंत ९५0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. सणासुदीत आत्महत्येचा आकडा वाढला आहे. शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर काढायचे असेल, तर सामाजिक सुरक्षिततेचा उपाय करावा लागणार आहे. दीर्घकालीन योजनांचे नियोजन करण्यास हरकत नाही; परंतु शेतकर्‍यांना सध्या तातडीच्या मदतीची गरज असल्याचे कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर स्पष्ट केले.