शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

राज्यात आतापर्यंत साडेनऊशे शेतक-यांच्या आत्महत्या!

By admin | Updated: November 23, 2015 01:30 IST

सणासुदीच्या महिन्यात आत्महत्यांचा आकडा पोहोचला ३५ वर.

अकोला : बदलते हवामान आणि सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला असून, सलग दहा वर्षांपासून पीक उत्पादनाचा पैसाच हाती येत नसल्याने राज्यातील कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. यावर्षी जानेवारीपासूनआजमितीस ९५0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. यावर्षी पाऊस नसल्याने राज्यातील खरीप हंगामातील सर्व पिकांचे उत्पादन प्रचंड घटले असून, रब्बी हंगामही हातचा गेला आहे. सलग दहा वर्षांपासून विदर्भातील कृषी विकासाचा दर शून्यावर आहे. शेतकर्‍यांच्या हातात पैसाच नसल्याने या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारा शेतकरी गारद झाला आहे. मागील दहा वर्षांपासून कधी अतवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ या ऋतुचक्रात शेतकरी भरडला आहे. उत्पादन खर्चही शेतीतून निघत नसून, कर्जाचा डोंगर, मुलींचे लग्न, शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह आदींची जुळवाजुळव करताना मेटाकुटीस आलेला शेतकरी मृत्यूला कवटाळीत आहे. यावर्षी यात दुष्काळाची भर पडली आहे. पाऊसच नसल्याने खरिपातील मूग, उडीद पिके हातची गेली. पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनचे उत्पादन एकरी २0 ते ५0 किलोपर्यंतच झाले आहे. मशागत, पेरणी, किडींच्या बदोबस्तासाठी फवारणी ते काढणीपर्यंत खर्च झेपावत नसल्याने शेकडो शेतकर्‍यांनी शेतातून सोयाबीन न काढणेच पसंत केले आहे. कापसाचे चित्रही वाईट असून, जूनमध्ये पेरणी केलेल्या कापसाला ज्या ठिकाणी सिंचनाची सोय होती, तिथे एकरी ३ क्विंटलच्यावर उतारा आहे; परंतु बहुतांश ठिकाणी कापसाचा एकरी उतारा एक ते दोन क्विंटल आहे. संपूर्ण राज्यातीलच चित्र वाईट असल्याने, पैशाअभावी शेतकरी सैरभैर झाला असून, सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. विदर्भात यावर्षी ५८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली असून, या सणासुदीच्या महिन्यात १ ते २२ नोव्हेंबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खान्देशातील ३५ च्यावर शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. राज्यात आतापर्यंत ९५0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. सणासुदीत आत्महत्येचा आकडा वाढला आहे. शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर काढायचे असेल, तर सामाजिक सुरक्षिततेचा उपाय करावा लागणार आहे. दीर्घकालीन योजनांचे नियोजन करण्यास हरकत नाही; परंतु शेतकर्‍यांना सध्या तातडीच्या मदतीची गरज असल्याचे कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर स्पष्ट केले.