शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आतापर्यंत साडेनऊशे शेतक-यांच्या आत्महत्या!

By admin | Updated: November 23, 2015 01:30 IST

सणासुदीच्या महिन्यात आत्महत्यांचा आकडा पोहोचला ३५ वर.

अकोला : बदलते हवामान आणि सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला असून, सलग दहा वर्षांपासून पीक उत्पादनाचा पैसाच हाती येत नसल्याने राज्यातील कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. यावर्षी जानेवारीपासूनआजमितीस ९५0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. यावर्षी पाऊस नसल्याने राज्यातील खरीप हंगामातील सर्व पिकांचे उत्पादन प्रचंड घटले असून, रब्बी हंगामही हातचा गेला आहे. सलग दहा वर्षांपासून विदर्भातील कृषी विकासाचा दर शून्यावर आहे. शेतकर्‍यांच्या हातात पैसाच नसल्याने या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारा शेतकरी गारद झाला आहे. मागील दहा वर्षांपासून कधी अतवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ या ऋतुचक्रात शेतकरी भरडला आहे. उत्पादन खर्चही शेतीतून निघत नसून, कर्जाचा डोंगर, मुलींचे लग्न, शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह आदींची जुळवाजुळव करताना मेटाकुटीस आलेला शेतकरी मृत्यूला कवटाळीत आहे. यावर्षी यात दुष्काळाची भर पडली आहे. पाऊसच नसल्याने खरिपातील मूग, उडीद पिके हातची गेली. पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनचे उत्पादन एकरी २0 ते ५0 किलोपर्यंतच झाले आहे. मशागत, पेरणी, किडींच्या बदोबस्तासाठी फवारणी ते काढणीपर्यंत खर्च झेपावत नसल्याने शेकडो शेतकर्‍यांनी शेतातून सोयाबीन न काढणेच पसंत केले आहे. कापसाचे चित्रही वाईट असून, जूनमध्ये पेरणी केलेल्या कापसाला ज्या ठिकाणी सिंचनाची सोय होती, तिथे एकरी ३ क्विंटलच्यावर उतारा आहे; परंतु बहुतांश ठिकाणी कापसाचा एकरी उतारा एक ते दोन क्विंटल आहे. संपूर्ण राज्यातीलच चित्र वाईट असल्याने, पैशाअभावी शेतकरी सैरभैर झाला असून, सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. विदर्भात यावर्षी ५८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली असून, या सणासुदीच्या महिन्यात १ ते २२ नोव्हेंबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खान्देशातील ३५ च्यावर शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. राज्यात आतापर्यंत ९५0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. सणासुदीत आत्महत्येचा आकडा वाढला आहे. शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर काढायचे असेल, तर सामाजिक सुरक्षिततेचा उपाय करावा लागणार आहे. दीर्घकालीन योजनांचे नियोजन करण्यास हरकत नाही; परंतु शेतकर्‍यांना सध्या तातडीच्या मदतीची गरज असल्याचे कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर स्पष्ट केले.