शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी व नापिकीमुळे राज्यात चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 30, 2015 00:48 IST

कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र अद्यापही थांबलेले नाही. खान्देश आणि विदर्भातील चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

मुंबई : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र अद्यापही थांबलेले नाही. खान्देश आणि विदर्भातील चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.धुळे येथील शालीग्राम संतोष पाटील (४५) आणि वाळकी ता. चोपडा येथील अशोक गिरधर धनगर(नायदे) या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शालिग्राम पाटील यांच्यावर खासगी सावकारी तसेच हातउसनवारीचे कर्ज होते. ते २६ डिसेंबरला सकाळी घरातून बाहेर निघून गेले होते. सोमवारी सांजोरी शिवारातील शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. तसेच अशोक धनगर यांच्यावरही खासगी सावकाराचे व पतसंस्था, सोसायटीच्या कर्जाला कंटाळून त्यांनी मंगळवारी दुपारी राहत्या घरी आत्महत्या केली.वर्धा जिल्ह्यामधील आष्टी येथील शेषराव पोकळे (६२) यांनी विहिरीत उडी घेऊन, तर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पेंढरीजवळच्या केवडा येथील शुभम कापटे (२२) याने विष प्राशन करून आत्महत्या केली. अहमदपूर शिवारातील गुल्हाने याच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेहच आढळून आला. त्यांच्यावर बँकेचे एक लाखाचे कर्ज होते. तर शुभम याने विष प्राशन केल्यानंतर त्याला चंद्रपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान, सोमवारी पहाटे त्याचे निधन झाले.(प्रतिनिधी)