शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

जवानाची सिमला येथे गोळी झाडून आत्महत्या

By admin | Updated: September 18, 2015 00:42 IST

अकोला जिल्ह्यातील सौंदळा येथील जवानाची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अज्ञात.

अकोला : इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात सेवारत असलेल्या तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथील नितीन गजाननराव गोतमारे या २४ वर्षे वयाच्या जवानाने सिमला येथे मुख्यालयात १६ सप्टेंबरच्या रात्री बंदुकीतून स्वत:वर गोळी चालवून आत्महत्या केली. त्यांचे पार्थिव १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास विमानाने नागपूर येथे पोहोचणार आहे.दरम्यान,नितीनच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. सौंदळा येथील शेतकरी कुटुंबातील नितीनच्या वडिलांकडे तीन एकर शेती आहे. नितीनने बारावीपयर्ंत शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षापूर्वी तो इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात भरती झाला होता. त्याने बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आयटीबीपीच्या सिमलास्थित तारादेवी मुख्यालयात बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. नितीनच्या आत्महत्येची बातमी सौंदळा येथे कळताच गावात शोककळा पसरली. गावातील व्यावसायिक व व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. त्याचे पार्थिव शुक्रवारी सकाळी विमानाने नागपूरला पोहोचल्यानंतर तेथून ते सौंदळा येथे आणले जाणार आहे. यासंदर्भात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसचे असिस्टंट कमांडर विक्रमसिंग यांनी आत्महत्येसंदर्भात सिमलामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला असून, या आत्महत्येची चौकशी सुरू असल्याचे सांगीतले. या आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.