शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचे हत्यार ब्लॅकमेलिंग अन् गुन्हेगारीसाठी

By admin | Updated: December 11, 2014 00:38 IST

एखाद्याने आपल्या मनासारखं काही केलं नाही की मी जीव देईन’, तू माङया प्रेमाचा स्वीकार केला नाहीस, तर आयुष्य संपवेन, ‘अहो माङया इच्छा पूर्ण करणार नसाल, तर जगून काय करू?’

केंद्राच्या निर्णयावर प्रतिक्रिया : आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन संस्थाची मदत
पुणो : ‘एखाद्याने आपल्या मनासारखं काही केलं नाही की मी जीव देईन’, तू माङया प्रेमाचा स्वीकार केला नाहीस, तर आयुष्य संपवेन, ‘अहो माङया इच्छा पूर्ण करणार नसाल, तर जगून काय करू?’ ही आणि अशासारख्या आत्महत्या करण्याच्या धमक्या अनेकांनी ऐकल्या असतील आणि त्याकडे अनेकदा सपशेल दुर्लक्षही केले असेल; कारण आपल्या देशात आत्महत्या करणो किंवा त्याचा प्रय} करणोही गुन्हा होतो. मात्र, आता हा आत्महत्या, आत्महत्येचे प्रय} गुन्हा राहणार नसल्याने धमकावणी, ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला नाही, तर त्यामागच्या नेमक्या कारणांचा उलगडा होणार नाही. याउलट गुन्हेगार खूनसुद्धा - आत्महत्याच दाखवून खुनाच्या गुन्ह्यातून सुटका करवून घेणा:यांची गुन्हेगारीवृत्तीही फोफावेल, अशी चर्चा रंगत आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येकाला जगण्याचे अधिकार दिले आहेत. हा अधिकार अबाधित राहण्यासाठीच देशात आत्महत्या हा गुन्हा मानला जायचा. आत्महत्येचा प्रय}ही गुन्हाच ठरायचा. आत्महत्या; तसेच आत्महत्येच्या प्रयत्नांचा गुन्ह्याचे भारतीय दंड विधानसंहितेतील कलम 3क्9 रद्द करण्यासंदर्भात केंद्राने शिफारस केली आहे. या पाश्र्वभूमीवर ‘लोकमत’ने कायदेतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकत्र्याशी संवाद साधला असता संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.  (प्रतिनिधी)
 
गुन्हेगारीलाही खतपाणी
4आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला नाही, तर नेमकी कोणत्या परिस्थितीत ती घटना घडली, याचा वेध घेतला जाणार नाही. अनेकदा गुन्हेगार खून करून, त्याला आत्महत्येचे स्वरूप देऊन स्वत:ची सुटका करून घेतील. गँगवार किंवा खूनशी प्रवृत्ती फोफावेल. गुन्हा दाखल न झाल्याने आत्महत्या की खून, याचा उलगडा होणार नाही. याचा फायदा गुन्हेगार घेणार आणि स्वत़:ची भाकरी भाजणार. इतरांना आत्महत्येस प्रवृत्त करणारेही नामानिराळे राहतील. 
 
तरुणांमध्ये वाढताहेत आत्महत्या
4आजच्या 21 व्या शतकात वाढत्या स्पर्धेमुळे तरुण वयात आत्महत्या करणा:यांचे प्रमाण वाढते आहे. यावर अशा व्यक्तींना समुपदेशन करणा:या संस्था अस्तित्वात आहेत; परंतु त्याचा कितपत फायदा होतो, याचा विचार करणो गरजेचे आहे, असे आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आधार देणारी संस्था ‘कनेक्टिंग इंडिया’चे प्रतिनिधी तुषार पाटील यांनी सांगितले.
4ते म्हणाले, ‘‘आत्महत्या करणा:या व्यक्तींची प्रत्येकाची कारणो वेगवेगळी असतात. कोणी प्रेमभंगाने, तर कोणी नोकरीतील ताण-तणावामुळे आत्महत्या करतो.’’ 
4कधी पैशांची अडचण असते, कधी एखाद्या गोष्टीचं व्यसनं असतं, तर कधी दीर्घकाळ आजारामुळे माणूस जीवन संपवण्याचा विचार करतो.
4परीक्षेत क मी गुण कि ंवा नापास झाल्याने येणा:या नैराश्याने आत्महत्या केल्याचे ब:याच वेळेला पाहायला मिळते. परंतु, अशी आत्महत्या करण्यामागे एवढं एकचं कारण असते असे नाही.तर त्याच्या आयुष्यातील पाश्र्वभूमी पाहिली असता त्या व्यक्तीने अनेक लहान-मोठ्या अडचणींना तोंड दिलेले असते. आणि त्याचा परिणाम परीक्षेतील आलेल्या नैराश्याने केलेली आत्महत्या असे समोर येते. परंतु ही पाश्र्वभूमी समजून घेणोही तितकेच महत्त्वाचे आहे.
 
नैरश्यात असलेला माणूसही गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने नकळत आत्महत्येपासून परावृत्त राहतो, पण गुन्हाच होणार नाही म्हटले, की कोणीही तात्पुरत्या नैराश्याचा ही बळी ठरेल. शिवाय, एखाद्याला ब्लॅकमेल करण्याचे प्रमाण खाढेल. कोणतेही छोटे-मोठे काम करवून घेण्यासाठी सहजरित्या लोक आत्महत्येची धमकी देतील आणि गुन्हेगारी वाढेल.
- अॅड सुप्रिया कोठारी 
 
संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. या पाश्र्वभूमीवर जगण्याचा अधिकार हिरावणारा आणि संविधानाला विरोधाभास निर्माण करणारे एखादे कलम अस्तित्त्वात येणो किंवा काढून टाकणो हे चुकीचे आहे. अप्रत्यक्षरीत्या संविधानालाच आव्हान आहे. तसेच, आत्महत्या ही आत्महत्याच कशावरून कळणार नाही. गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल. प्रत्येक खून हा आत्महत्याच म्हणून दाखवला जाईल. खून की आत्महत्या फरक कसा करणार?
- अॅड. चेतन भुतडा 
आत्महत्येच्या विचारार्पयत पोहोचलेला मनुष्य गुन्हा आहे का, या पलीकडे गेलेला असतो, त्यातून बचावणा:याच्या मागेही पुन्हा कायद्याचा ससेमिरा लागला, तर तो आणखी नैराश्यात जातो. त्यामुळे गुन्हा म्हणून नोंद न होणो हा चांगलाच भाग आहे. या उलट आत्महत्येचा प्रय} केलेल्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करून तेथे समस्येच्या मुळापयर्ंत जाणारी यंत्रणा उभी केली पाहिजे. आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या मानसिक उभारीसाठी प्रय} होणो आवश्यक आहे.- अॅड रेणुका राजपूत