शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

मोदींना प्रश्न करून सुशिक्षित बेरोजगाराची आत्महत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 17:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध प्रश्न करून आणि त्यावर विचार करण्याचे सांगून एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने विष प्रशन करून आत्महत्या केल्याची घटना

ऑलाइन लोकमतयवतमाळ, दि. ३१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध प्रश्न करून आणि त्यावर विचार करण्याचे सांगून एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने विष प्रशन करून आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्याच्या मारवाडी येथे शनिवारी घडली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने युवकांना भविष्य घडविण्याचा संदेशही लिहिला आहे. गोपाल बाबाराव राठोड (२२) असे त्याचे नाव आहे.

वडिलांच्या नावावर असलेली तीन एकर शेती सांभाळून गोपाल हा बोरीअरब येथील कला-वाणिज्य महाविद्यालयात बी.ए. व्दितीय वर्षाला शिकत होता. गतवर्षी तो याच महाविद्यालयाच्या आणि नेर येथे वास्तव्याला असलेल्या एका प्राध्यापकाच्या संपर्कात आला. त्यांनी गोपालला शेळीपालनाचा व्यवसाय उभा करून दिला. तेथून १५ दिवसानेच अर्थात शनिवारी सायंकाळी ७ वाजता गोपाल हा या प्राध्यापकाच्या घरी पोहोचला.

त्याने विष घेतल्याचे लक्षात येताच तत्काळ रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळला हलविले. उपचारादरम्यान त्याचा रात्री मृत्यू झाला.  गोपालने मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत ह्यमोदीजी इस सवाल पर बहुत ज्यादा गौर करोह्ण असे सांगून अनेक प्रश्न उपस्थित केले. विविध खेळांच्या चमुमध्ये श्रीमंतांची मुले आहेत. पण ज्यांच्या कष्टामुळे दोन वेळेचे जेवण मिळते त्या शेतकऱ्यांच्या मुलांनी काय करावे, अभियांत्रिकीला प्राध्यापकांची मुले एक लाख रुपये भरू शकतात पण शेतकऱ्यांची मुले महाविद्यालयाची फी भरू शकत नाही, त्यांनी काय करावे.

व्यवसायासाठी कर्ज मागितले तर बँका संपत्ती गहाण ठेवायला सांगतात, ज्यांच्याकडे संपत्ती नाही त्यांचे काय, वेतन घेणाऱ्यांना न मागता महागाई भत्ता मिळतो, पण शेतकऱ्यांना भाव मागता मागता कमी होतो असे का, पोलिसात चौकशी शिवाय गुन्हा दाखल होतो हा कुठला नियम आहे, रोजगारासाठी आॅटोरिक्षा चालविणाऱ्यांना पोलिसांना हप्ता द्यावा लागतो, असे का याप्रकारचे प्रश्न गोपालने उपस्थित केले आहे.

कोणाला आपण सुख देऊ शकत नाही तर कमीतकमी दु:ख तरी देऊ नका, त्या जीवनात कुणीही कुणाचे नाही, मेहनत करा आणि स्वत:चे भविष्य घडवा, असा संदेश देणारी चिठ्ठीही त्याने लिहून ठेवली आहे. शेवटी नाव आणि स्वाक्षरी करून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर विचार करावा असे म्हटले आहे. चिठ्ठीच त्याने आई, वडील, भाऊ आणि बहिणींची माफी मागितली आहे. सदर युवकाच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.

वडिलोपार्जीत शेतावर कर्जगोपाल बाबाराव राठोड याच्या वडिलोपार्जीत तीन एकर शेतावर युनीयन बँकेचे ७० हजार आणि खासगी एक लाख ५० हजार रुपयांचे कर्ज आहे. मागील अनेक वर्षांपासूनची नापिकी यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. यातूनच गोपालने आत्महत्या केली असावी, असे सांगितले जाते.