शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

आत्मघाती हल्ल्यांचा धोका

By admin | Updated: October 26, 2014 01:02 IST

एअर इंडियाचे विमान बॉम्बस्फोट किंवा आत्मघाती हल्ला करून उडवून देण्याचा धोका गुप्तचर यंत्रणांनी गोपनीय माहितीच्या आधारे व्यक्त केला आहे.

सुरक्षा यंत्रणा सतर्क : मुंबई, अहमदाबाद, कोची विमानतळांवर रेड अलर्ट
मुंबई/अहमदाबाद/कोची: एअर इंडियाचे विमान बॉम्बस्फोट किंवा आत्मघाती हल्ला करून उडवून देण्याचा धोका गुप्तचर यंत्रणांनी गोपनीय माहितीच्या आधारे व्यक्त केला आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई, अहमदाबाद, कोची विमानतळावर 
रेड अलर्ट जारी करण्यात आला 
आहे.  चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई- कोची तसेच अहमदाबाद-मुंबई या क्षेत्रत एअर इंडियाच्या विमानाला धोका असल्याची माहिती कोलकात्याहून मिळाली असल्याचे कोची येथील विमानतळ संचालक ए. के. सी नायर यांनी सांगितले. आत्मघाती बॉम्बर्स एअर इंडियाच्या दोन विमानांमध्ये चढण्याचा प्रय} करतील, असा इशारा नवी दिल्लीतील नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाकडून एका पत्रद्वारे देण्यात आला. 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री किंवा 25 ऑक्टोबरच्या सकाळी अहमदाबादहून मुंबईला तसेच पहाटे 5 वाजता कोचीहून मुंबईला जाणा:या विमानांना लक्ष्य केले जाऊ शकते.
प्रत्येक विमानात वेगवेगळा सुसाइड बॉम्बर असेल. त्यामुळे कसून चौकशी केल्यानंतर विमान उड्डाणांना परवानगी द्यावी, असे या पत्रत म्हटले होते. धोका लक्षात घेता या दोन तारखांना अहमदाबाद, मुंबई विमानतळांवरील सर्व विमानांची सुरक्षा वाढविली जाईल. अहमदाबादचे नागरी विमान वाहतूक प्रादेशिक उपायुक्तांनी 22 ऑक्टोबर रोजी या पत्रची प्रत संबंधित अधिका:यांना दिली. याआधीच विमानतळांभोवती चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रवाशांची कसून चौकशी करण्यासह विमानतळावरील प्रवेशाबाबतही चांगलीच छाननी होत आहे. अपहरणप्रतिबंधक पथकांनाही सतर्क करण्यात आले आहे. 
2क्क्2 मधील दंगलीनंतर गुजरात हे अल-कायदाच्या हिटलिस्टवर पहिल्या स्थानी आले आहे. मोदी पंतप्रधान बनल्यानंतर अल-कायदाने या राज्यावरच लक्ष केंद्रित केले असल्याचे एका अधिका:याने स्पष्ट केले. जवाहिरीच्या व्हिडिओतही गुजरातचा उल्लेख होता. भारतात अल-कायदाची स्थापना झाल्यामुळे म्यानमार, बांगला देश, आसाम, गुजरात आणि काश्मीर या राज्यांमधील मुस्लिमांमध्ये बंध निर्माण होतील, असेही त्यात म्हटले होते.
 
दिवाळीच्या 
आनंदावर विरजण
सुरक्षा यंत्रणतेतील जवान दिवाळी साजरी करण्याच्या मन:स्थितीत असतानाच हल्ल्यांबाबत सावधगिरीचा इशारा देण्यात आल्यामुळे मुंबई, अहमदाबाद, कोची विमानतळांवरील अधिका:यांना धक्का बसला. सतर्कतेच्या इशा:यानंतर तिन्ही विमानतळांवरील 
संपूर्ण यंत्रणा सुरक्षा बंदोबस्ताला लागली.
 
आयसिस व अल-कायदाची हातमिळवणी
भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी आयसीस आणि अल-कायदा या दोन संघटनांनी हातमिळवणी केल्याची माहिती मिळाली आहे. गेल्याच महिन्यात अल-कायदाने भारतात शाखा उघडण्याची घोषणा केली. या संघटनेचा प्रमुख आयमन अल जवाहिरी याने व्हिडीओही जारी केला होता.