शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आत्मघाती हल्ल्यांचा धोका

By admin | Updated: October 26, 2014 01:02 IST

एअर इंडियाचे विमान बॉम्बस्फोट किंवा आत्मघाती हल्ला करून उडवून देण्याचा धोका गुप्तचर यंत्रणांनी गोपनीय माहितीच्या आधारे व्यक्त केला आहे.

सुरक्षा यंत्रणा सतर्क : मुंबई, अहमदाबाद, कोची विमानतळांवर रेड अलर्ट
मुंबई/अहमदाबाद/कोची: एअर इंडियाचे विमान बॉम्बस्फोट किंवा आत्मघाती हल्ला करून उडवून देण्याचा धोका गुप्तचर यंत्रणांनी गोपनीय माहितीच्या आधारे व्यक्त केला आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई, अहमदाबाद, कोची विमानतळावर 
रेड अलर्ट जारी करण्यात आला 
आहे.  चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई- कोची तसेच अहमदाबाद-मुंबई या क्षेत्रत एअर इंडियाच्या विमानाला धोका असल्याची माहिती कोलकात्याहून मिळाली असल्याचे कोची येथील विमानतळ संचालक ए. के. सी नायर यांनी सांगितले. आत्मघाती बॉम्बर्स एअर इंडियाच्या दोन विमानांमध्ये चढण्याचा प्रय} करतील, असा इशारा नवी दिल्लीतील नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाकडून एका पत्रद्वारे देण्यात आला. 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री किंवा 25 ऑक्टोबरच्या सकाळी अहमदाबादहून मुंबईला तसेच पहाटे 5 वाजता कोचीहून मुंबईला जाणा:या विमानांना लक्ष्य केले जाऊ शकते.
प्रत्येक विमानात वेगवेगळा सुसाइड बॉम्बर असेल. त्यामुळे कसून चौकशी केल्यानंतर विमान उड्डाणांना परवानगी द्यावी, असे या पत्रत म्हटले होते. धोका लक्षात घेता या दोन तारखांना अहमदाबाद, मुंबई विमानतळांवरील सर्व विमानांची सुरक्षा वाढविली जाईल. अहमदाबादचे नागरी विमान वाहतूक प्रादेशिक उपायुक्तांनी 22 ऑक्टोबर रोजी या पत्रची प्रत संबंधित अधिका:यांना दिली. याआधीच विमानतळांभोवती चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रवाशांची कसून चौकशी करण्यासह विमानतळावरील प्रवेशाबाबतही चांगलीच छाननी होत आहे. अपहरणप्रतिबंधक पथकांनाही सतर्क करण्यात आले आहे. 
2क्क्2 मधील दंगलीनंतर गुजरात हे अल-कायदाच्या हिटलिस्टवर पहिल्या स्थानी आले आहे. मोदी पंतप्रधान बनल्यानंतर अल-कायदाने या राज्यावरच लक्ष केंद्रित केले असल्याचे एका अधिका:याने स्पष्ट केले. जवाहिरीच्या व्हिडिओतही गुजरातचा उल्लेख होता. भारतात अल-कायदाची स्थापना झाल्यामुळे म्यानमार, बांगला देश, आसाम, गुजरात आणि काश्मीर या राज्यांमधील मुस्लिमांमध्ये बंध निर्माण होतील, असेही त्यात म्हटले होते.
 
दिवाळीच्या 
आनंदावर विरजण
सुरक्षा यंत्रणतेतील जवान दिवाळी साजरी करण्याच्या मन:स्थितीत असतानाच हल्ल्यांबाबत सावधगिरीचा इशारा देण्यात आल्यामुळे मुंबई, अहमदाबाद, कोची विमानतळांवरील अधिका:यांना धक्का बसला. सतर्कतेच्या इशा:यानंतर तिन्ही विमानतळांवरील 
संपूर्ण यंत्रणा सुरक्षा बंदोबस्ताला लागली.
 
आयसिस व अल-कायदाची हातमिळवणी
भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी आयसीस आणि अल-कायदा या दोन संघटनांनी हातमिळवणी केल्याची माहिती मिळाली आहे. गेल्याच महिन्यात अल-कायदाने भारतात शाखा उघडण्याची घोषणा केली. या संघटनेचा प्रमुख आयमन अल जवाहिरी याने व्हिडीओही जारी केला होता.