शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

साखरखेर्डा लालफितमध्ये पडून

By admin | Updated: June 12, 2014 22:18 IST

साखरखेर्डा तालुका निर्मितीचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेत लालफीतमध्ये पडून आहे.

सिंदखेडराजा: गत २४ वर्षापासून साखरखेर्डा तालुका निर्मितीचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेत लालफीतमध्ये पडून आहे. तो प्रश्न आज नविन जिल्हे आणि तालुके होत असतांना मांडणे गरजेचे आहे. यासाठी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे काय भूमिका घेतात, याकडे सर्वसामान्य जनतेच्या नजरा लागल्या आहेत. साखरखेर्डा तालुका निर्मिती क्षेत्रात संभाव्य ८५ गावाचा समावेश असून, चार जिल्हा परिषद सर्कलचे अंतर २५ की.मी.चे आत आहे. यात सिंदखेडराजा तालुक्यातील ३६, लोणार तालुक्यातील ५, मेहकर तालुक्यातील २५ आणि चिखली तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. सिंदखेडराजा मतदार संघात जी गावे आहेत; परंतु तालुके बाहेरच्या मतदार संघातील आहेत. अशी सर्व नावे साखरखेर्डा गावाशी संलग्न असून, ती सर्व गावे संभाव्य तालुक्याशी निगडीत आहेत.साखरखेर्डा गावची लोकसंख्या २0 हजार असून येथे ३ इंग्रजी माध्यमाच्या शाळा, स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, वाणिज्य महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय, चार माध्यमिक विद्यालय, तीन खासगी प्राथमिक शाळा, जि.प. प्राथमिक शाळा मराठी, कन्या आणि उर्दू शाळा आहेत. सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांची वैभवशाली सुतगिरणी, व्यापारी बाजारपेठ येथे असून, पाच बँकाही आहेत. दररोज हजारो लोकांची वर्दळ येथे असते. साखरखेर्डा गाव सिंदखेडराजा तालुक्यात असून, सिंदखेडराजा आणि बुलडाण्याचे अंतर सारखेच आहे. भौगोलीक दृष्ट्या सिंदखेडराजा तालुका अयोग्य असून कोठेच कशाचा मेळ नाही. मेहकर येथून १५ कि.मी. अंतरावर असलेले शेवगा जहाँगीर हे गाव ७५ की.मी. अंतरावर असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यात आहे. असे विचित्र भौगोलीक क्षेत्रफळ या तालुक्याचे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या समोर या अगोदर प्रश्न मांडण्यात आला होता. तत्कालीन महसुल मंत्री छगनराव भुजबळ यांनी कृती आराखडा सुद्धा मागविला होता. त्यात वसंतराव मगर, स्व.आप्पासाहेब देशमुख, स्व.सखाराम हाडे, स्व.प्रा.डी.एन.गवई, स्व. भगवानराव पाटील, भाऊसाहेब सावजी, माजी सरपंच शे.युसूफ कुरेशी, रविंद्र पाटील, राम जाधव, चंद्रशेखर शुक्ल, साहेबराव काटे, बाबुराव मोरे, आदी मंडळी तालुका मागणीसाठी पुढे सरसावली होती.त्यानंतर तालुका कृती समितीचे अध्यक्षपद डॉ.राजेंद्र शिंगणे यांना देवून संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. साखरखेर्डा तालुका निर्मितीची तब्बल २0 वर्षात फक्त जनतेतून मागणी होत होती. परंतु राजकीय पटलावर कधीच आली नाही. तालुका निर्मिती झाल्यास विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे साखरखेर्डा तालुका व्हावा, या मागणीसाठी तेजराव देशमुख, मदनशेठ जैस्वाल, दामुअण्णा शिंगणे, शिवदास रिंढे, रमेश गवई, सुनिल जगताप, राजेंद्र तळेकर, भोजराज गाडेकर यांनी वेळोवेळी उपोषणे केली आणि मागणीत जीवंतपणा ठेवला. सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा, अस्मीतेचा प्रश्न म्हणून विधानसभेत प्रश्न लावून धरावा आणि मागणीचे सार्थक करावे, हीच जनतेची अपेक्षा आहे.