शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

साखरखेर्डा लालफितमध्ये पडून

By admin | Updated: June 12, 2014 22:18 IST

साखरखेर्डा तालुका निर्मितीचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेत लालफीतमध्ये पडून आहे.

सिंदखेडराजा: गत २४ वर्षापासून साखरखेर्डा तालुका निर्मितीचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेत लालफीतमध्ये पडून आहे. तो प्रश्न आज नविन जिल्हे आणि तालुके होत असतांना मांडणे गरजेचे आहे. यासाठी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे काय भूमिका घेतात, याकडे सर्वसामान्य जनतेच्या नजरा लागल्या आहेत. साखरखेर्डा तालुका निर्मिती क्षेत्रात संभाव्य ८५ गावाचा समावेश असून, चार जिल्हा परिषद सर्कलचे अंतर २५ की.मी.चे आत आहे. यात सिंदखेडराजा तालुक्यातील ३६, लोणार तालुक्यातील ५, मेहकर तालुक्यातील २५ आणि चिखली तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. सिंदखेडराजा मतदार संघात जी गावे आहेत; परंतु तालुके बाहेरच्या मतदार संघातील आहेत. अशी सर्व नावे साखरखेर्डा गावाशी संलग्न असून, ती सर्व गावे संभाव्य तालुक्याशी निगडीत आहेत.साखरखेर्डा गावची लोकसंख्या २0 हजार असून येथे ३ इंग्रजी माध्यमाच्या शाळा, स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, वाणिज्य महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय, चार माध्यमिक विद्यालय, तीन खासगी प्राथमिक शाळा, जि.प. प्राथमिक शाळा मराठी, कन्या आणि उर्दू शाळा आहेत. सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांची वैभवशाली सुतगिरणी, व्यापारी बाजारपेठ येथे असून, पाच बँकाही आहेत. दररोज हजारो लोकांची वर्दळ येथे असते. साखरखेर्डा गाव सिंदखेडराजा तालुक्यात असून, सिंदखेडराजा आणि बुलडाण्याचे अंतर सारखेच आहे. भौगोलीक दृष्ट्या सिंदखेडराजा तालुका अयोग्य असून कोठेच कशाचा मेळ नाही. मेहकर येथून १५ कि.मी. अंतरावर असलेले शेवगा जहाँगीर हे गाव ७५ की.मी. अंतरावर असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यात आहे. असे विचित्र भौगोलीक क्षेत्रफळ या तालुक्याचे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या समोर या अगोदर प्रश्न मांडण्यात आला होता. तत्कालीन महसुल मंत्री छगनराव भुजबळ यांनी कृती आराखडा सुद्धा मागविला होता. त्यात वसंतराव मगर, स्व.आप्पासाहेब देशमुख, स्व.सखाराम हाडे, स्व.प्रा.डी.एन.गवई, स्व. भगवानराव पाटील, भाऊसाहेब सावजी, माजी सरपंच शे.युसूफ कुरेशी, रविंद्र पाटील, राम जाधव, चंद्रशेखर शुक्ल, साहेबराव काटे, बाबुराव मोरे, आदी मंडळी तालुका मागणीसाठी पुढे सरसावली होती.त्यानंतर तालुका कृती समितीचे अध्यक्षपद डॉ.राजेंद्र शिंगणे यांना देवून संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. साखरखेर्डा तालुका निर्मितीची तब्बल २0 वर्षात फक्त जनतेतून मागणी होत होती. परंतु राजकीय पटलावर कधीच आली नाही. तालुका निर्मिती झाल्यास विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे साखरखेर्डा तालुका व्हावा, या मागणीसाठी तेजराव देशमुख, मदनशेठ जैस्वाल, दामुअण्णा शिंगणे, शिवदास रिंढे, रमेश गवई, सुनिल जगताप, राजेंद्र तळेकर, भोजराज गाडेकर यांनी वेळोवेळी उपोषणे केली आणि मागणीत जीवंतपणा ठेवला. सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा, अस्मीतेचा प्रश्न म्हणून विधानसभेत प्रश्न लावून धरावा आणि मागणीचे सार्थक करावे, हीच जनतेची अपेक्षा आहे.