शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘साखर संघाचे धोरण सहकाराला मारक’

By admin | Updated: September 25, 2016 02:19 IST

सहकारी साखर कारखान्यांपुढे निर्माण झालेल्या समस्यांबाबत राज्य सहकारी संघ बघ्याची भूमिका घेत आहे़ राज्य सरकारच्या दबावाखाली साखर संघही काम करत आहे, असा आरोप

लोणी (जि. अहमदनगर) : सहकारी साखर कारखान्यांपुढे निर्माण झालेल्या समस्यांबाबत राज्य सहकारी संघ बघ्याची भूमिका घेत आहे़ राज्य सरकारच्या दबावाखाली साखर संघही काम करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. साखर संघाला आता पूर्वीचे वैभव राहिलेले नाही. संघाचे धोरण सहकाराला मारक ठरत असल्याची टीका त्यांनी केली़ पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार विरोधी धोरणावर त्यांनी टीका केली. बाळासाहेब विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या पाण्याच्या लढाईला खऱ्या अर्थाने यश आले आहे. हतबल होऊन बसलो असतो तर हक्काचे पाणी गेले असते. न्यायालयाच्या निर्णयामुळे पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे अनेक वर्षांच्या मागणीला मूर्त स्वरुप मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.तीन वर्षांचा दुष्काळ आणि समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे शेतकरी आणि शेती व्यवस्था उध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांना १०० टक्के कर्ज माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)