शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साखर उद्योगाला कामगार टंचाई ?

By admin | Updated: October 14, 2016 02:22 IST

साखर गाळप हंगामाची तारीख १ डिसेंबरऐवजी १ नोव्हेंबर करावी, अशी मागणी जोर धरत असून, विविध साखर कारखान्यांनी तशी लेखी मागणी साखर आयुक्तालयाकडे केली असल्याचे

विशाल शिर्के / पुणेसाखर गाळप हंगामाची तारीख १ डिसेंबरऐवजी १ नोव्हेंबर करावी, अशी मागणी जोर धरत असून, विविध साखर कारखान्यांनी तशी लेखी मागणी साखर आयुक्तालयाकडे केली असल्याचे समजते. कर्नाटकचा गाळप पंधरा दिवस लवकर सुरू होत असल्याने, ऊसतोडणी कामगारांची टंचाई जाणवू शकते, त्यामुळे हंगाम लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे यंदा केवळ ४४५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. त्यातून ५०.२८ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे, तसेच यंदा १४५ साखर कारखाने सुरू होतील, अशी शक्यता आहे. दर वर्षी साधारणत: १५ आॅक्टोबरपासून साखर कारखान्यांची धुराडी पेटतात. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात हंगामास जोर येतो. यंदा मंत्रिसमितीने १ डिसेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु साखर कारखान्यांनीच लवकर हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी साखर आयुक्तालयाकडे केली आहे. कर्नाटकने १५ नोव्हेंबरपासून गाळप सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने, विशेषत: सोलापूर, कोल्हापूर, सांगली या कर्नाटकच्या सीमेजवळील कारखान्यांकडून या मागणीने उचल खाल्ली आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या प्रस्तावांचा विचार करून सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.