शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सूडाचे राजकारण ही आमची औलाद नाही : सुभाष देशमुख

By admin | Updated: November 1, 2016 13:31 IST

राज्याचा सर्वांगीण विकास करताना कोणत्याही प्रकारचे सुडाचे राजकारण आम्ही करणार नाही व आमची ती औलादही नाही असा खरमरीत टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विरोधकांना लगावला़.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १ -   पिशवीतल्या सहकारी संस्थांच्या जीवावर राजकारण करून संस्था, बँका, सुत गिरण्या, सोसायटी संस्था, पतसंस्था, साखर कारखान्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ता मिळविली़. सर्वसामान्य शेतक-यांना कर्जे देण्याऐवजी बँकेच्या संचालकांनी आपल्याच उद्योगांना बेकायदेशीररित्या कर्जे मंजूर करून घेतली़ या भ्रष्ट्र कारभारामुळेच आघाडी सरकारच्या काळात राज्यातील बँका व सुतगिरण्या बुडाल्या़. राज्याचा सर्वांगीण विकास करताना कोणत्याही प्रकारचे सुडाचे राजकारण आम्ही करणार नाही व आमची ती औलादही नाही असा खरमरीत टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विरोधकांना लगावला़  
राज्यातील भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दोन वर्षात करण्यात आलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलत होते़ यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी, लोकमंगल उद्योग समुहाचे संचालक अविनाश महागांवकर, उत्तर तालुका भाजपाचे अध्यक्ष आप्पासाहेब कदम आदी मान्यवर उपस्थित होते़ 
यावेळी बोलताना सहकारमंत्री म्हणाले की, राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वत:च्याच नावावर बेकायदेशीररित्या कर्जे घेऊन बँका बुडविल्या.  या बुडविलेल्या बँकांना ऊर्जावस्थेत आणण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. भाजप सरकार सहकार खाते मोडीत काढण्याचा प्रयत्न करतय अशी टिका करणा-या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील ५७ सहकारी साखर कारखाने कोणी विकत घेतल्या, जिल्हा बँका, साखर कारखाने कोणी मोडीत काढले याचे उत्तर द्यावे.
राज्यात आगामी काळात सहकार क्षेत्र वाढविण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्र वाढविण्यावर भाजप सरकार जास्तीचा भर देणार आहे. राज्यातील बंद पडलेल्या सुतगिरण्या सुरू करण्याचा भाजप प्रयत्न करीत आह.  त्यासाठी इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही वीजेचे दर कमी करून एक दिलासा सूतगिरण्यांना देण्याचा प्रयत्न लवकरच भाजप सरकार करणार आहे.  शिवाय शेतक-यांना एफआरपीप्रमाणे रक्कम न देणा-या साखर कारखान्यांची खासगी मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगितले.
 
भाजप सरकारच्या कामगिरीवर एक नजर
भाजप सरकारने दोन वर्षाच्या कालावधीत जलयुक्त शिवार योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, मुद्रा योजना, अन्नसुरक्षा योजना, कृषीपंपांना त्वरीत वीजजोडणी, पोलीसांना घरे, बँकींग क्षेत्रात वेगवेगळे बदल यासारखे नाविन्यपूर्ण योजना अंमलात आणून सर्वसामान्यांना सेवासुविधा पुरविण्यावर जास्तीचा भर दिल्याचेही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.