शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सूडाचे राजकारण ही आमची औलाद नाही : सुभाष देशमुख

By admin | Updated: November 1, 2016 13:31 IST

राज्याचा सर्वांगीण विकास करताना कोणत्याही प्रकारचे सुडाचे राजकारण आम्ही करणार नाही व आमची ती औलादही नाही असा खरमरीत टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विरोधकांना लगावला़.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १ -   पिशवीतल्या सहकारी संस्थांच्या जीवावर राजकारण करून संस्था, बँका, सुत गिरण्या, सोसायटी संस्था, पतसंस्था, साखर कारखान्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ता मिळविली़. सर्वसामान्य शेतक-यांना कर्जे देण्याऐवजी बँकेच्या संचालकांनी आपल्याच उद्योगांना बेकायदेशीररित्या कर्जे मंजूर करून घेतली़ या भ्रष्ट्र कारभारामुळेच आघाडी सरकारच्या काळात राज्यातील बँका व सुतगिरण्या बुडाल्या़. राज्याचा सर्वांगीण विकास करताना कोणत्याही प्रकारचे सुडाचे राजकारण आम्ही करणार नाही व आमची ती औलादही नाही असा खरमरीत टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विरोधकांना लगावला़  
राज्यातील भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दोन वर्षात करण्यात आलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलत होते़ यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी, लोकमंगल उद्योग समुहाचे संचालक अविनाश महागांवकर, उत्तर तालुका भाजपाचे अध्यक्ष आप्पासाहेब कदम आदी मान्यवर उपस्थित होते़ 
यावेळी बोलताना सहकारमंत्री म्हणाले की, राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वत:च्याच नावावर बेकायदेशीररित्या कर्जे घेऊन बँका बुडविल्या.  या बुडविलेल्या बँकांना ऊर्जावस्थेत आणण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. भाजप सरकार सहकार खाते मोडीत काढण्याचा प्रयत्न करतय अशी टिका करणा-या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील ५७ सहकारी साखर कारखाने कोणी विकत घेतल्या, जिल्हा बँका, साखर कारखाने कोणी मोडीत काढले याचे उत्तर द्यावे.
राज्यात आगामी काळात सहकार क्षेत्र वाढविण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्र वाढविण्यावर भाजप सरकार जास्तीचा भर देणार आहे. राज्यातील बंद पडलेल्या सुतगिरण्या सुरू करण्याचा भाजप प्रयत्न करीत आह.  त्यासाठी इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही वीजेचे दर कमी करून एक दिलासा सूतगिरण्यांना देण्याचा प्रयत्न लवकरच भाजप सरकार करणार आहे.  शिवाय शेतक-यांना एफआरपीप्रमाणे रक्कम न देणा-या साखर कारखान्यांची खासगी मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगितले.
 
भाजप सरकारच्या कामगिरीवर एक नजर
भाजप सरकारने दोन वर्षाच्या कालावधीत जलयुक्त शिवार योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, मुद्रा योजना, अन्नसुरक्षा योजना, कृषीपंपांना त्वरीत वीजजोडणी, पोलीसांना घरे, बँकींग क्षेत्रात वेगवेगळे बदल यासारखे नाविन्यपूर्ण योजना अंमलात आणून सर्वसामान्यांना सेवासुविधा पुरविण्यावर जास्तीचा भर दिल्याचेही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.