शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

मुंबईबाबत थोडं जपूनच - उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

By admin | Updated: December 9, 2014 13:29 IST

मंगलकार्य करण्यास जावे व अचानक श्राद्ध घडावे हा धोका वाटत असल्याने मुंबईबाबत ताकही फुंकून प्यावे असे वाटते, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - मंगलकार्य करावयास जावे व अचानक श्राद्ध घडावे हा धोका वाटत असल्यानेच मुंबईच्या बाबतीत ताकही फुंकून प्यावे असे वाटते, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना सल्लावजा इशारा देण्यात आला आहे.  ‘मुंबई’च्या विकासाची सूत्रे थेट दिल्लीच्या हाती ठेवणे हे महाराष्ट्राला किती रुचेल व त्याचे राजकीय परिणाम काय होतील, याचा साधकबाधक विचार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाच असेल, असे लेखात म्हटले आहे.  मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही व मुंबईवर फक्त महाराष्ट्र राज्याचेच नियंत्रण राहील हे शिवसेनेचे मत असल्याचे सांगत मुंबईवर जो पंतप्रधानांचा अंकुश येऊ पाहात आहे यावर शिवसेनेची भूमिका सरकार पक्ष म्हणून महत्त्वाची ठरणार असल्याचा इशारा अग्रलेखातून देण्यात आला आहे. मुंबईचा विकास व्हावा हे तर खरेच, पण रोगापेक्षा औषध भयंकर ठरेल असे काही घडू नये, असेही लेखात म्हटले आहे. मुंबई प्रमाणेच राज्यातील अन्य शहरांनाही जागतिक दर्जाचे केल्यास बरे होईल असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.