शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

मुंबईबाबत थोडं जपूनच - उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

By admin | Updated: December 9, 2014 13:29 IST

मंगलकार्य करण्यास जावे व अचानक श्राद्ध घडावे हा धोका वाटत असल्याने मुंबईबाबत ताकही फुंकून प्यावे असे वाटते, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - मंगलकार्य करावयास जावे व अचानक श्राद्ध घडावे हा धोका वाटत असल्यानेच मुंबईच्या बाबतीत ताकही फुंकून प्यावे असे वाटते, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना सल्लावजा इशारा देण्यात आला आहे.  ‘मुंबई’च्या विकासाची सूत्रे थेट दिल्लीच्या हाती ठेवणे हे महाराष्ट्राला किती रुचेल व त्याचे राजकीय परिणाम काय होतील, याचा साधकबाधक विचार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाच असेल, असे लेखात म्हटले आहे.  मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही व मुंबईवर फक्त महाराष्ट्र राज्याचेच नियंत्रण राहील हे शिवसेनेचे मत असल्याचे सांगत मुंबईवर जो पंतप्रधानांचा अंकुश येऊ पाहात आहे यावर शिवसेनेची भूमिका सरकार पक्ष म्हणून महत्त्वाची ठरणार असल्याचा इशारा अग्रलेखातून देण्यात आला आहे. मुंबईचा विकास व्हावा हे तर खरेच, पण रोगापेक्षा औषध भयंकर ठरेल असे काही घडू नये, असेही लेखात म्हटले आहे. मुंबई प्रमाणेच राज्यातील अन्य शहरांनाही जागतिक दर्जाचे केल्यास बरे होईल असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.