शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

विद्यार्थ्यांना पैसे नव्हे, पुस्तकेच मिळणार

By admin | Updated: March 10, 2017 00:53 IST

विद्यार्थ्यांना यापुढे विनामूल्य पाठ्यपुस्तकांऐवजी अनुदानाचे पैसेच दिले जातील, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच या निर्णयाचा फेरविचार

- अविनाश साबापुरे,  यवतमाळविद्यार्थ्यांना यापुढे विनामूल्य पाठ्यपुस्तकांऐवजी अनुदानाचे पैसेच दिले जातील, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच या निर्णयाचा फेरविचार करण्याची वेळ शासनावर आली आहे. इतक्या कमी कालावधीत प्रत्येक विद्यार्थ्याचे बँक खाते काढणे आणि ते आधारशी जोडणे शक्य नसल्याची उपरती अधिकाऱ्यांना झाली असून यंदाही विद्यार्थ्यांना शाळेतूनच विनामूल्य पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.केंद्राच्या धोरणानुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याऐवजी, तेवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी) टाकण्याचा निर्णय घेतला होता. २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना पुस्तकाऐवजी पैसे मिळणार होते. त्यादृष्टीने दोन महिन्यांत प्रत्येक विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँक खाते काढून, ते आधारशी जोडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अजूनही विद्यार्थ्यांची बँक खाती उघडण्याचे काम पूर्ण झालेले नाही. अनेक विद्यार्थ्यांची आधार नोंदणीही झाली नसल्याने हे काम २०१८-१९ या सत्रात होणार आहे.‘एसएमएस’ आला, पत्रही येणारआधार आणि बँक खात्यांचे काम पूर्ण न झाल्याने यंदा विद्यार्थ्यांना डीबीटीऐवजी पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील पाठ्यपुस्तकांची मागणी तयार ठेवा. येत्या चार-पाच दिवसांत अधिकृत पत्र मिळेल, असा एसएमएस वरिष्ठ पातळीवरून शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याला प्राप्त झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.