शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

अकारावीत प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थीनीची आत्महत्या

By admin | Updated: July 25, 2016 17:54 IST

दहावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाले त्यामुळे अकारावीत प्रवेश मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागणार या नैराश्येपोटी घाटनांद्रा ता. मेहकर येथील एका विद्यार्थीनीने विहीरीत

ऑनलाइन लोकमतबुलढिाणा  : दहावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाले त्यामुळे  अकारावीत प्रवेश मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागणार या नैराश्येपोटी घाटनांद्रा ता. मेहकर येथील एका विद्यार्थीनीने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.  कु.जया विजय राठोड असे या विद्यार्थीनीेचे नाव आहे. 

मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा येथील विजय राठोड यांची मुलगी कु. जया विजय राठोड ही खामगाव येथील न्यु.ईरा हायस्कुलमध्ये शिक्षण घेत होती. यावर्षी ती दहावी पास झाली. मात्र दहावीमध्ये तीला जेमतेम ४५ टक्केच गुण मिळाले. कमी गुण मिळाले तरी तीने पुढील शिक्षण घेण्याची ईच्छा वडिलाजवळ व्यक्त केली.

  मुलगी किमान १२ वी पर्यंत शिकावी अशी वडिलांची सुध्दा ईच्छा होती. म्हणून विजय राठोड यांनी तीला अकरावीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांना अपयश आले. कोणत्याच कॉलेजला प्रवेश मिळत नव्हाता, अनेक महाविद्यालयाचे उबंरठे राठोड यांनी झीजवूनही त्यांना यश मिळाले नाही. काही कॉलेजवर प्रवेश पाहिजे असेल तर डोनेशन लागेल, असे सांगण्यात आले मात्र प्रवेशाससाठी पैसे भरण्याची त्यांची ऐपत नसल्याने आपणाला शिक्षणापासून वंचित रहावे लागणार या नैराश्यापोटी जया हीने २५ जूलैच्या सकाळी घरातील सर्व मंडळी झोपलेली असल्याचे पाहून ती घराशेजारील विहीरीवर गेली, व तीने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली.

. ही बाब सकाळी उघडकीस आली. प्रवेशासाठी डोनेशन भरू शकत नसल्याने जया राठोड हिने आत्महत्या केल्याच्या या घटनेमुळे परिसरात हळ हळव्यक्त होत आहे.गरीबीमुळे पुन्हा एका सावित्रीचा अंतएसटी बसची पास काढण्यासाठी वडिलाकडे पैसे नसल्यामुळे मागील वर्षी एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली होती. अशीच काहीशी घाटनांद्रा येथील ही घटना असून मृतक जया राठोड हिचे वडिल अल्पभुधारक आहेत. मागील दोन वर्षापासून नापिकीमुळे शेतीत माल होत नाही. मागील वर्षी पेरणीसाठी काढलेले बँकेचे ५० हजार रूपये कर्ज कायम आहे. अशातच यावर्षी सुध्दा पेरणीसाठी उसनवारी करावी लागली. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे विजय राठोड यांनी मुलीच्या शिक्षणाला पुर्णविराम द्यावा लागला होता. मुलींच्या शिक्षणावर शासन कोट्यावधी रूपये खर्च करते. तरीही गरीबी व दारिद्र्यामुळे अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याच गरीबी व दारिद्र्यामुळे आज पुन्हा एका सावित्रीला आपली जीवनयात्रा संपवावी लागली