शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

सहावीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्याची कविता!

By admin | Updated: February 19, 2016 03:47 IST

एरवी इतरांचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांना, आता त्यांच्यापैकीच कोणीतरी लिहिलेली कथा, कविता पाठ्यपुस्तकातून अभ्यासण्याची विलक्षण अनुभूती मिळणार असून

यदु जोशी ,  मुंबईएरवी इतरांचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांना, आता त्यांच्यापैकीच कोणीतरी लिहिलेली कथा, कविता पाठ्यपुस्तकातून अभ्यासण्याची विलक्षण अनुभूती मिळणार असून, या अनोखी प्रयोगाची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षण आणि संशोधन परिषदेने राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना यासंबंधी पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या निवडक कथा, कविता मागविल्या आहेत. विशेष म्हणजे निवड झालेली कथा, कविता ही त्या विद्यार्थ्याच्या हस्ताक्षरातच पुस्तकात छापली जाणार आहे. विद्यार्थ्यांना लेखक म्हणून पाठ्यपुस्तकात स्थान देऊन त्यांच्या प्रज्ञा-प्रतिभेला नवं आकाश निर्माण करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न असेल. पुढच्या वर्षी सहावीत जाणार असलेल्या विद्यार्थ्यांच्या लिखाणाची निवड त्यासाठी केली जाणार आहे. हे लिखाण शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून येत्या आठ दिवसांत ्िर१.े२ूी१३@ॅें्र’.ूङ्मे या मेलवर शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी जाणकार शिक्षकाकडून आपल्या जिल्ह्यातील सर्वोत्तम कविता, कथेची निवड करून ती पाठवायची आहे. आशयाला अनुरूप त्याच विद्यार्थ्याने काढलेले चित्र असेल तर उत्तम, कवितेचा विषय विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी निगडित असावा, असे राज्य शिक्षण आणि संशोधन परिषदेने स्पष्ट केले आहे. परिषदेच्या सूत्रांनी सांगितले की, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या कथा, कविता या पाठ्यक्रम तयार करणाऱ्या अभ्यास मंडळासमोर ठेवण्यात येतील आणि अभ्यास मंडळ अंतिम निर्णय घेईल. विद्यार्थी जीवनातच मुलांना लेखक होण्याची ही सुवर्णसंधी असेल आणि इतर विद्यार्थ्यांना त्यापासून लिखाणाची प्रेरणा मिळेल हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. आपल्याच पाठ्यपुस्तकात आपली कथा, कविता अभ्यासण्याचा पहिला मान कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता असेल. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढील वर्षीपासून अन्य इयत्तांसाठीही असाच उपक्रम राबविण्याचा परिषदेचा विचार आहे.