ठाणे/नवी मुंबई : पनवेलहून ठाण्याकडे येणाऱ्या लोकलमध्ये चाकूहल्ला करून रत्नागिरीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या ऐरोलीतील तुषार जाधव या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली.तुषार ऐरोली सेक्टर-२मध्ये राहतो. तो रत्नागिरीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता़ कोकणकन्या एक्स्पे्रसने सकाळी पनवेल रेल्वे स्थानकात उतरल्यावर तोे पहाटे ४.३० ते ५.१५ या कालावधीत लोकलने ऐरोलीकडे येत असताना घणसोली स्थानकात बचाव बचाव अशा किंकाळ्या गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदारांनी ऐकल्या. त्याने आरडाओरडाही केला़ परंतु, तोपर्यंत गाडीने स्थानक सोडले होते. त्यामुळे संबंधित पोलिसांनी याबाबतची माहिती हेल्पलाइनला दिल्यानंतर ज्या डब्यात हल्ला झाला होता, त्या ठिकाणी पोलीस गेले. तिथे जबर जखमी, रक्तबंबाळ झालेला तुषार त्यांना दिसला. त्यांनी तातडीने तुषारला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला नेले. मात्र अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
लोकलमध्ये विद्यार्थ्याची हत्या
By admin | Updated: June 13, 2014 02:31 IST