शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत संघर्ष

By admin | Updated: April 1, 2017 03:57 IST

राज्यात शेतकरीविरोधी भाजपा सरकार सत्तेत आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कर्जमाफी हा तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न

हिंगोली : राज्यात शेतकरीविरोधी भाजपा सरकार सत्तेत आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कर्जमाफी हा तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न. त्यावर इतिहासात प्रथमच सर्व विरोधी पक्षाच नेते एकत्र आले. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत या सरकारच्या विरोधात संघर्ष सुरूच राहिल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.कर्जमाफीच्या प्रश्नावर काँग्रेस- राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षाने काढलेली संघर्ष यात्रा शुक्रवारी दुपारी हिंगोलीत पोहचली. येथील इंदिरा गांधी चौकात जाहीर सभा झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, समाजवादी पक्षाचे आ. आबु आझमी, आ. कृष्णा पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, आ. अमित झनक, आ. शशिकांत शिंदे, आ.डॉ. संतोष टारफे, आ. राहुल बेंद्रे, आ. सुनील केदार, आ. प्रदीप नाईक, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, संजय बोंढारे आदींची उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी या सरकारकडे पैसा आहे. परंतु गेली तीन वर्षे दुष्काळामुळे व आज शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसा नसल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. परिणामी, आता फडणवीस अडचणीत सापडले. वेळ आल्यावर निश्चित कर्जमाफीवर निर्णय घेतला जाईल, असे ते सांगत आहेत. परंतु दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कर्जमाफीचा निर्णय त्या- त्या राज्याच्या माथी मारण्याचा निर्णय जाहीर करून केंद्रांने अंग झटकल्याचा आरोपही त्यांनी केला.कर्नाटक सरकारने कृषी मूल्य आयोग आणून शेतकऱ्यांचा माल हमी भावाने खरेदीची काम सुरू केले. मात्र महाराष्ट्र सरकारचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. याबाबत जागृती झाली पाहिजे. राज्यात आमचे सरकार असताना हेच फडणवीस कापसाला ७ हजार रुपये भाव देण्याची व शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर आमच्याविरोधात ३०२ चा खटला का करू नये? अशी भाषा करत होते. अडीच वर्षात ८ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. (प्रतिनिधी)फडणवीस सरकार शेतकरीविरोधी - पवारअजित पवार यांनीही फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला. हे सरकार झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंगोली येथील कॉटन मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर फडणवीस सरकार शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.