शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत संघर्ष

By admin | Updated: April 1, 2017 03:57 IST

राज्यात शेतकरीविरोधी भाजपा सरकार सत्तेत आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कर्जमाफी हा तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न

हिंगोली : राज्यात शेतकरीविरोधी भाजपा सरकार सत्तेत आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कर्जमाफी हा तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न. त्यावर इतिहासात प्रथमच सर्व विरोधी पक्षाच नेते एकत्र आले. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत या सरकारच्या विरोधात संघर्ष सुरूच राहिल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.कर्जमाफीच्या प्रश्नावर काँग्रेस- राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षाने काढलेली संघर्ष यात्रा शुक्रवारी दुपारी हिंगोलीत पोहचली. येथील इंदिरा गांधी चौकात जाहीर सभा झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, समाजवादी पक्षाचे आ. आबु आझमी, आ. कृष्णा पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, आ. अमित झनक, आ. शशिकांत शिंदे, आ.डॉ. संतोष टारफे, आ. राहुल बेंद्रे, आ. सुनील केदार, आ. प्रदीप नाईक, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, संजय बोंढारे आदींची उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी या सरकारकडे पैसा आहे. परंतु गेली तीन वर्षे दुष्काळामुळे व आज शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसा नसल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. परिणामी, आता फडणवीस अडचणीत सापडले. वेळ आल्यावर निश्चित कर्जमाफीवर निर्णय घेतला जाईल, असे ते सांगत आहेत. परंतु दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कर्जमाफीचा निर्णय त्या- त्या राज्याच्या माथी मारण्याचा निर्णय जाहीर करून केंद्रांने अंग झटकल्याचा आरोपही त्यांनी केला.कर्नाटक सरकारने कृषी मूल्य आयोग आणून शेतकऱ्यांचा माल हमी भावाने खरेदीची काम सुरू केले. मात्र महाराष्ट्र सरकारचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. याबाबत जागृती झाली पाहिजे. राज्यात आमचे सरकार असताना हेच फडणवीस कापसाला ७ हजार रुपये भाव देण्याची व शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर आमच्याविरोधात ३०२ चा खटला का करू नये? अशी भाषा करत होते. अडीच वर्षात ८ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. (प्रतिनिधी)फडणवीस सरकार शेतकरीविरोधी - पवारअजित पवार यांनीही फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला. हे सरकार झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंगोली येथील कॉटन मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर फडणवीस सरकार शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.