शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत संघर्ष

By admin | Updated: April 1, 2017 03:57 IST

राज्यात शेतकरीविरोधी भाजपा सरकार सत्तेत आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कर्जमाफी हा तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न

हिंगोली : राज्यात शेतकरीविरोधी भाजपा सरकार सत्तेत आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कर्जमाफी हा तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न. त्यावर इतिहासात प्रथमच सर्व विरोधी पक्षाच नेते एकत्र आले. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत या सरकारच्या विरोधात संघर्ष सुरूच राहिल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.कर्जमाफीच्या प्रश्नावर काँग्रेस- राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षाने काढलेली संघर्ष यात्रा शुक्रवारी दुपारी हिंगोलीत पोहचली. येथील इंदिरा गांधी चौकात जाहीर सभा झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, समाजवादी पक्षाचे आ. आबु आझमी, आ. कृष्णा पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, आ. अमित झनक, आ. शशिकांत शिंदे, आ.डॉ. संतोष टारफे, आ. राहुल बेंद्रे, आ. सुनील केदार, आ. प्रदीप नाईक, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, संजय बोंढारे आदींची उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी या सरकारकडे पैसा आहे. परंतु गेली तीन वर्षे दुष्काळामुळे व आज शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसा नसल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. परिणामी, आता फडणवीस अडचणीत सापडले. वेळ आल्यावर निश्चित कर्जमाफीवर निर्णय घेतला जाईल, असे ते सांगत आहेत. परंतु दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कर्जमाफीचा निर्णय त्या- त्या राज्याच्या माथी मारण्याचा निर्णय जाहीर करून केंद्रांने अंग झटकल्याचा आरोपही त्यांनी केला.कर्नाटक सरकारने कृषी मूल्य आयोग आणून शेतकऱ्यांचा माल हमी भावाने खरेदीची काम सुरू केले. मात्र महाराष्ट्र सरकारचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. याबाबत जागृती झाली पाहिजे. राज्यात आमचे सरकार असताना हेच फडणवीस कापसाला ७ हजार रुपये भाव देण्याची व शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर आमच्याविरोधात ३०२ चा खटला का करू नये? अशी भाषा करत होते. अडीच वर्षात ८ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. (प्रतिनिधी)फडणवीस सरकार शेतकरीविरोधी - पवारअजित पवार यांनीही फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला. हे सरकार झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंगोली येथील कॉटन मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर फडणवीस सरकार शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.