शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

गर्दीच्या हंगामात एसटी ढेपाळली

By admin | Updated: May 15, 2014 02:35 IST

एसटी बसची असलेली दयनीय स्थिती आणि सातत्याने वाढत असलेले भाडे पाहता यंदाच्या गर्दीच्या हंगामात तर प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे.

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीची सध्या मोठी वाताहत होत असून वर्षानुवर्षे असलेला नियोजनाचा अभाव, एसटी बसची असलेली दयनीय स्थिती आणि सातत्याने वाढत असलेले भाडे पाहता यंदाच्या गर्दीच्या हंगामात तर प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे एसटी सेवा गर्दीच्या हंगामात सुरुवातीच्या ४0 दिवसांतच ढेपाळली आहे. यात मुंबई आणि औरंगाबाद क्षेत्रात प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून अमरावती आणि नाशिक क्षेत्रातही स्थिती बिकटच असल्याचे समोर आले आहे. २0१0-११ मध्ये एसटीचे भारमान ६१.८४ टक्के होते. हेच भारमान २0११-१२ मध्ये ६१.७0 टक्के झाले. त्यानंतर, २0१२-१३ मध्ये ६0.४६ तर २0१३-१४ मध्ये ५८.५0 टक्के झाले. यावरूनच प्रवासी संख्या कमीकमी होत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, २0१४ च्या गर्दीचा हंगाम असलेल्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तरी परिस्थिती सुधारेल, अशी आशा एसटी महामंडळाला होती. मात्र, तसे न होता ती आणखीच बिकट होत चालली आहे. एसटीचा गर्दीचा हंगाम नेहमी १५ एप्रिलपासून सुरू होतो. यंदाच्या १ एप्रिल ते १0 मे या ४0 दिवसांची एसटीची परिस्थिती महामंडळाकडून तपासण्यात आली असता ती अक्षरश: ढेपाळल्याचे चित्र आहे. मुंबई क्षेत्रात येणार्‍या मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे विभागांतील भारमान मागील वर्षाशी तुलना करता यंदा ३.0३ टक्क्यांनी कमी झाले आहे. औरंगाबाद क्षेत्रात येणार्‍या औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणीचे भारमान २.५५ टक्क्यांनी कमी झाले आहे. अमरावती क्षेत्राचे २.४१ टक्क्यांनी, नाशिकचे १.७२ आणि नागपूर क्षेत्राचे १.१९ आणि पुणे क्षेत्राचे 0.९५ टक्क्यांनी कमी झाल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)