शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या हंगामात एसटी ढेपाळली

By admin | Updated: May 15, 2014 02:35 IST

एसटी बसची असलेली दयनीय स्थिती आणि सातत्याने वाढत असलेले भाडे पाहता यंदाच्या गर्दीच्या हंगामात तर प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे.

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीची सध्या मोठी वाताहत होत असून वर्षानुवर्षे असलेला नियोजनाचा अभाव, एसटी बसची असलेली दयनीय स्थिती आणि सातत्याने वाढत असलेले भाडे पाहता यंदाच्या गर्दीच्या हंगामात तर प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे एसटी सेवा गर्दीच्या हंगामात सुरुवातीच्या ४0 दिवसांतच ढेपाळली आहे. यात मुंबई आणि औरंगाबाद क्षेत्रात प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून अमरावती आणि नाशिक क्षेत्रातही स्थिती बिकटच असल्याचे समोर आले आहे. २0१0-११ मध्ये एसटीचे भारमान ६१.८४ टक्के होते. हेच भारमान २0११-१२ मध्ये ६१.७0 टक्के झाले. त्यानंतर, २0१२-१३ मध्ये ६0.४६ तर २0१३-१४ मध्ये ५८.५0 टक्के झाले. यावरूनच प्रवासी संख्या कमीकमी होत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, २0१४ च्या गर्दीचा हंगाम असलेल्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तरी परिस्थिती सुधारेल, अशी आशा एसटी महामंडळाला होती. मात्र, तसे न होता ती आणखीच बिकट होत चालली आहे. एसटीचा गर्दीचा हंगाम नेहमी १५ एप्रिलपासून सुरू होतो. यंदाच्या १ एप्रिल ते १0 मे या ४0 दिवसांची एसटीची परिस्थिती महामंडळाकडून तपासण्यात आली असता ती अक्षरश: ढेपाळल्याचे चित्र आहे. मुंबई क्षेत्रात येणार्‍या मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे विभागांतील भारमान मागील वर्षाशी तुलना करता यंदा ३.0३ टक्क्यांनी कमी झाले आहे. औरंगाबाद क्षेत्रात येणार्‍या औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणीचे भारमान २.५५ टक्क्यांनी कमी झाले आहे. अमरावती क्षेत्राचे २.४१ टक्क्यांनी, नाशिकचे १.७२ आणि नागपूर क्षेत्राचे १.१९ आणि पुणे क्षेत्राचे 0.९५ टक्क्यांनी कमी झाल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)