शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

गर्दीच्या हंगामात एसटी ढेपाळली

By admin | Updated: May 15, 2014 02:35 IST

एसटी बसची असलेली दयनीय स्थिती आणि सातत्याने वाढत असलेले भाडे पाहता यंदाच्या गर्दीच्या हंगामात तर प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे.

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीची सध्या मोठी वाताहत होत असून वर्षानुवर्षे असलेला नियोजनाचा अभाव, एसटी बसची असलेली दयनीय स्थिती आणि सातत्याने वाढत असलेले भाडे पाहता यंदाच्या गर्दीच्या हंगामात तर प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे एसटी सेवा गर्दीच्या हंगामात सुरुवातीच्या ४0 दिवसांतच ढेपाळली आहे. यात मुंबई आणि औरंगाबाद क्षेत्रात प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून अमरावती आणि नाशिक क्षेत्रातही स्थिती बिकटच असल्याचे समोर आले आहे. २0१0-११ मध्ये एसटीचे भारमान ६१.८४ टक्के होते. हेच भारमान २0११-१२ मध्ये ६१.७0 टक्के झाले. त्यानंतर, २0१२-१३ मध्ये ६0.४६ तर २0१३-१४ मध्ये ५८.५0 टक्के झाले. यावरूनच प्रवासी संख्या कमीकमी होत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, २0१४ च्या गर्दीचा हंगाम असलेल्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तरी परिस्थिती सुधारेल, अशी आशा एसटी महामंडळाला होती. मात्र, तसे न होता ती आणखीच बिकट होत चालली आहे. एसटीचा गर्दीचा हंगाम नेहमी १५ एप्रिलपासून सुरू होतो. यंदाच्या १ एप्रिल ते १0 मे या ४0 दिवसांची एसटीची परिस्थिती महामंडळाकडून तपासण्यात आली असता ती अक्षरश: ढेपाळल्याचे चित्र आहे. मुंबई क्षेत्रात येणार्‍या मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे विभागांतील भारमान मागील वर्षाशी तुलना करता यंदा ३.0३ टक्क्यांनी कमी झाले आहे. औरंगाबाद क्षेत्रात येणार्‍या औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणीचे भारमान २.५५ टक्क्यांनी कमी झाले आहे. अमरावती क्षेत्राचे २.४१ टक्क्यांनी, नाशिकचे १.७२ आणि नागपूर क्षेत्राचे १.१९ आणि पुणे क्षेत्राचे 0.९५ टक्क्यांनी कमी झाल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)