शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्या वाढीचा ताण शहरांवर

By admin | Updated: July 14, 2014 04:06 IST

देशातील ५० टक्के लोकसंख्या ही शहरी भागांत राहते़ कृषिप्रधान असलेल्या या देशात सध्या शेती किफायतशीर राहिली नाही़

राजेश भिसे, मुंबईदेशातील ५० टक्के लोकसंख्या ही शहरी भागांत राहते़ कृषिप्रधान असलेल्या या देशात सध्या शेती किफायतशीर राहिली नाही़ परिणामी, ग्रामीण भागांतून रोजगाराच्या शोधात लोंढे शहरांकडे वळत आहेत़ लोंढे थोपविण्यासाठी ग्रामीण भागांतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे वा कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात शहरे अधिक बकाल आणि ग्रामीण भाग ओस पडण्याचीच शक्यता अधिक आहे़महानगरांप्रमाणेच इतर शहरांनाही वाढत्या लोकसंख्येची समस्या भेडसावत असून काळाची पावले ओळखून यावर उपाययोजना करणे अगत्याचे आहे़ राज्याचा विचार करता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आदी शहरांतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते़ ़ एकूणच लोकसंख्या वाढीचा ताण हा प्रामुख्याने शहरांवरच असल्याचे दिसून येते़ लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी जन्मदर नियंत्रण, संतती नियमन शस्त्रक्रियांसारखे उपाय योजता येऊ शकतील़ लोकसंख्येत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे़ गेल्या काही वर्षांमध्ये चीनने विविध उपाययोजना आखून यावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले़ आगामी काही वर्षांमध्ये भारत हा तरुणांचा देश होणार असला तरी त्या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे अन्यथा, अवाढव्य लोकसंख्या असूनही उत्पादन श्रमशक्ती वाया जाऊन देश दिशाहीन होण्याची भीती अधिक आहे़ लोकसंख्येत महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे़ आजमितीला राज्याची लोकसंख्या ११ कोटी ७३ लाख ५३ हजार ६३६ इतकी आहे़ देशाच्या लोकसंख्येचा विचार करता ही टक्केवारी ९़२९ इतकी आहे़ लोकसंख्या वाढीचा वेग जनजागृती, लोकशिक्षण आदींद्वारे कमी करता येऊ शकेल़ वाढती लोकसंख्या ही जागतिक स्तरावरील समस्या बनली असून याचा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणदृष्ट्या म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगवरदेखील परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा होणारा ऱ्हास आणि वाढत्या लोकसंख्येचा ताळमेळ भविष्यात बसणे मुश्कील होणार आहे़ तब्बल २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश एवढा प्रचंड भूविस्तार असलेल्या आणि जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या देशामध्ये आगामी काळात अनेक आव्हाने निर्माण होणार आहेत़ देशातील विविध महानगरांतील लोकसंख्या वाढीचा वेग पाहता याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे़ आगामी काळात जास्त लोकसंख्या असलेल्या भागांतून लोक कमी लोकसंख्या असलेल्या भागांत स्थलांतरित होतील़ सुदृढ अर्थव्यवस्था असलेला भाग मागास भागातील लोकांना आकर्षित करेल़ परिणामी, स्थानिक स्तरावर कार्बनडायआॅक्साइडच्या उत्सर्जनामुळे तापमान वाढून याचा परिणाम जागतिक स्तरावर ऋतुचक्र बदलात होईल़ तसेच अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम होणार होऊन असुरक्षितता निर्माण होईल़ त्याचप्रमाणे महानगरांमध्ये दाटीवाटीची वस्ती वाढण्याची शक्यता असून साथीचे आजार पसरून त्याचा प्रादुर्भाव जगभरात होण्याची भीती एका अभ्यासामध्ये व्यक्त करण्यात आली आहे़ अर्थव्यवस्थेवर याचा वाढता ताण, पर्यावरणाची अधोगती यासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठीची क्षमता कमी होणे आदी परिणाम होण्याची शक्यता आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)