शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

लोकसंख्या वाढीचा ताण शहरांवर

By admin | Updated: July 14, 2014 04:06 IST

देशातील ५० टक्के लोकसंख्या ही शहरी भागांत राहते़ कृषिप्रधान असलेल्या या देशात सध्या शेती किफायतशीर राहिली नाही़

राजेश भिसे, मुंबईदेशातील ५० टक्के लोकसंख्या ही शहरी भागांत राहते़ कृषिप्रधान असलेल्या या देशात सध्या शेती किफायतशीर राहिली नाही़ परिणामी, ग्रामीण भागांतून रोजगाराच्या शोधात लोंढे शहरांकडे वळत आहेत़ लोंढे थोपविण्यासाठी ग्रामीण भागांतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे वा कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात शहरे अधिक बकाल आणि ग्रामीण भाग ओस पडण्याचीच शक्यता अधिक आहे़महानगरांप्रमाणेच इतर शहरांनाही वाढत्या लोकसंख्येची समस्या भेडसावत असून काळाची पावले ओळखून यावर उपाययोजना करणे अगत्याचे आहे़ राज्याचा विचार करता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आदी शहरांतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते़ ़ एकूणच लोकसंख्या वाढीचा ताण हा प्रामुख्याने शहरांवरच असल्याचे दिसून येते़ लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी जन्मदर नियंत्रण, संतती नियमन शस्त्रक्रियांसारखे उपाय योजता येऊ शकतील़ लोकसंख्येत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे़ गेल्या काही वर्षांमध्ये चीनने विविध उपाययोजना आखून यावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले़ आगामी काही वर्षांमध्ये भारत हा तरुणांचा देश होणार असला तरी त्या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे अन्यथा, अवाढव्य लोकसंख्या असूनही उत्पादन श्रमशक्ती वाया जाऊन देश दिशाहीन होण्याची भीती अधिक आहे़ लोकसंख्येत महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे़ आजमितीला राज्याची लोकसंख्या ११ कोटी ७३ लाख ५३ हजार ६३६ इतकी आहे़ देशाच्या लोकसंख्येचा विचार करता ही टक्केवारी ९़२९ इतकी आहे़ लोकसंख्या वाढीचा वेग जनजागृती, लोकशिक्षण आदींद्वारे कमी करता येऊ शकेल़ वाढती लोकसंख्या ही जागतिक स्तरावरील समस्या बनली असून याचा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणदृष्ट्या म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगवरदेखील परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा होणारा ऱ्हास आणि वाढत्या लोकसंख्येचा ताळमेळ भविष्यात बसणे मुश्कील होणार आहे़ तब्बल २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश एवढा प्रचंड भूविस्तार असलेल्या आणि जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या देशामध्ये आगामी काळात अनेक आव्हाने निर्माण होणार आहेत़ देशातील विविध महानगरांतील लोकसंख्या वाढीचा वेग पाहता याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे़ आगामी काळात जास्त लोकसंख्या असलेल्या भागांतून लोक कमी लोकसंख्या असलेल्या भागांत स्थलांतरित होतील़ सुदृढ अर्थव्यवस्था असलेला भाग मागास भागातील लोकांना आकर्षित करेल़ परिणामी, स्थानिक स्तरावर कार्बनडायआॅक्साइडच्या उत्सर्जनामुळे तापमान वाढून याचा परिणाम जागतिक स्तरावर ऋतुचक्र बदलात होईल़ तसेच अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम होणार होऊन असुरक्षितता निर्माण होईल़ त्याचप्रमाणे महानगरांमध्ये दाटीवाटीची वस्ती वाढण्याची शक्यता असून साथीचे आजार पसरून त्याचा प्रादुर्भाव जगभरात होण्याची भीती एका अभ्यासामध्ये व्यक्त करण्यात आली आहे़ अर्थव्यवस्थेवर याचा वाढता ताण, पर्यावरणाची अधोगती यासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठीची क्षमता कमी होणे आदी परिणाम होण्याची शक्यता आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)