शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातही स्ट्रॉबेरीचे उत्पादन!

By admin | Updated: January 18, 2015 01:07 IST

शेतीच्या दृष्टीने प्रतिकूल असलेल्या कोकणातील वातावरणास छेद देत कृतिशील महिला शेतकऱ्याने माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती पिकवली आहे.

आदर्शवत शेती : कृतिशील महिला शेतकऱ्याचा अनोखा प्रयोगकपिल गुरव ल्ल आचरा (जि़ सिंधुदुर्ग)शेतीच्या दृष्टीने प्रतिकूल असलेल्या कोकणातील वातावरणास छेद देत कृतिशील महिला शेतकऱ्याने माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती पिकवली आहे. कोकण म्हटले की, नजरेसमोर येतो तो विस्तीर्ण समुद्रकिनारा. दमट आणि खाऱ्या हवामानात बहरणारा फळांचा राजा हापूस, नारळ, सुपारी, काजूच्या बागांनी बहरलेला भूप्रदेश, खाडीपात्रात आणि सागरकिनारी चालणारी मासेमारी. एकूणच अशा वातावरणात इतर पिके घेणे तसे आव्हानच़ मात्र, हे आव्हान पेलले आहे ज्योती गोलतकर यांनी़ देवगड-आचरा-मालवण या हमरस्त्यावरील चिंदर सडेवाडी येथील माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती त्यांनी केली़ ज्योती यांनी शेतीतील एक आगळ्यावेगळ्या प्रयोगाचा इतर शेतकऱ्यांना वास्तुपाठ घालून दिला आहे़ राज्य शासनाच्या फलोद्यान योजनेचा आधार घेत कोकणवासीयांनी परंपरागत शेतीकडे पाठ फिरवत भरघोस उत्पन्न देणाऱ्या आंबा-काजूच्या बागा फुलविल्या. अलीकडच्या काळात निसर्गाच्या लहरी वातावरणामुळे आंबा-काजू पिकांवरही परिणाम होऊ लागला आहे. हातातोंडाशी आलेले पीक काहीवेळा वाया जात आहे. माती परीक्षण केले़ मातीबद्दल तज्ज्ञांच्या अहवालानंतर शेतात विविध फळे, फुले, भाजीपाला पिकवता येऊ शकतो, हे ज्योती यांनी जाणले आणि मग व्हॅनिलाची लागवड केली़ याला यश आल्यानंतर त्यांनी स्ट्रॉबेरीचेही उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला.महाबळेश्वर आणि आचरा भागातील तापमानामध्ये चार-पाच डिग्रीचाच फरक आहे. फक्त या परिसरात दुपारचे प्रखर ऊन सोडले तर बाकी वातावरण महाबळेश्वरशी मिळतेजुळते. गरज होती ती फक्त अथक परिश्रमांची आणि वातावरण नियंत्रित ठेवण्याची. महाबळेश्वर येथील काही शेतकऱ्यांच्या साहाय्याने ज्योती यांनी गेल्या वर्षी प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी शेती करण्यास सुरुवात केली. या स्ट्रॉबेरी शेतीच्या प्रयोगामध्ये कोणतेच रिवार्इंड बटण नसून एखाद्या जैविकाचा किंवा खताचा डोस चुकला तर सर्व मेहनत वाया जाण्याची शक्यता अधिक असते़ सुरुवातीचे एक वर्ष केवळ प्रायोगिक तत्त्वावर केलली लागवड यशस्वी झाल्यामुळे ज्योती गोलतकर यांचा उत्साह वाढला. ८ गुंठे जमिनीत कॅमेरोजा आणि विंटरडाऊन या जातीच्या वाणांची लागवड त्यांनी केली आहे. प्रखर उन्हावर नियंत्रण मिळविण्याकरिता स्प्रिंकर्लर्स आणि पाण्याचा सुयोग्य मेळ साधला आहे. दरदिवशी ३० किलोपर्यंत उत्पन्न येत असून, किलोमागे २०० रुपयांचा बाजारभाव त्यांना स्थानिक बाजारपेठेत मिळत आहे.