शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

आयुष्याचा अर्थ समजावणारी मनोहर पर्रिकरांची कलिंगडाची गोष्ट

By admin | Updated: March 16, 2017 14:33 IST

मनोहर पर्रिकर देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या गावच्या कलिंगडांची सांगितलेली गोष्ट भरपूर काही शिकवणारी आहे.

 ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. 16 - साधी राहणी आणि पारदर्शक कारभार ही मनोहर पर्रिकरांची मुख्य ओळख. उच्च शिक्षित असूनही पर्रिकरांनी नेहमीच स्वत:ला तळागाळातील जनतेशी जोडून ठेवले. त्यामुळे आजच्या तारखेला त्यांच्या इतका गोव्यात दुसरा लोकप्रिय नेता नाही. गोव्यात फक्त त्यांच्या नावावरच अन्य पक्षांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे फक्त 13 जागा जिंकूनही आज गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन झाले. 
 
हेच मनोहर पर्रिकर देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या गावच्या कलिंगडांची सांगितलेली गोष्ट भरपूर काही शिकवणारी आहे. पर्रिकरांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी सांगितलेली ही गोष्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  
 
कलिंगडातून मनोहर पर्रिकरांनी समजावला आयुष्याचा अर्थ 
 
मी गोव्यातील पारा गावचा. त्यामुळे आम्हाला सगळे पर्रिकर बोलतात. माझ गाव कलिंगडाच्या शेतीसाठी प्रसिद्ध होते. मी लहान असताना आमच्या गावातील शेतकरी मे महिन्यात कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचे. जास्तीत जास्त मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बोलावले जायचे. काही वर्षांनी मी इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी आयआयटी मुंबईला गेलो. 
 
साडेसहा वर्षांनी जेव्हा मी पुन्हा गावी गेलो. त्यावेळी मी कलिंगड घेण्यासाठी बाजारात गेलो. त्यावेळी तिथे छोटया आकाराची कलिंगड मला दिसले. जो शेतकरी कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचा त्याला भेटण्यासाठी मी गेलो. त्यावेळी सूत्र त्याच्या मुलाच्या हाती होती. त्याचा मुलगा कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचा पण त्यात फरक पडला होता. 
 
ज्यावेळी त्या मुलाचे वडिल आम्हाला कलिंगड खायला द्यायचे त्यावेळी कलिंगडाच्या बिया एका भांडयात जमा करायला ते आम्हाला सांगायचे. पुढच्या हंगामासाठी ते या बिया गोळा करायचे. आम्ही त्यांच्यासाठी बिनपगारी बालमजूर होतो. ते स्पर्धेसाठी सर्वोत्तम कलिंगड ठेवायचे त्यामुळे पुढच्या हंगामात अधिक मोठया आकाराचे चांगले कलिंगड मिळायचे. 
 
पण त्यांच्या मुलाने जेव्हा व्यवसाय संभाळला तेव्हा मोठया आकाराच्या कलिंगड विक्रीतून जास्त पैसा मिळत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे मोठी कलिंगडे तो बाजारात विकायचा आणि छोटी कलिंगडे स्पर्धेसाठी ठेवायचा. त्यामुळे त्या बियांमधून तयार होणा-या कलिंगडचा आकार छोटा असायचा. जशी वर्ष पुढे सरकत गेली तसा कलिंगडाचा आकार छोटा होत गेला. 
 
कलिंगडामध्ये एका पिढीमध्ये एका वर्षाचे अंतर असते. सातवर्षात परामधील सर्वोत्तम कलिंगड संपलेले होते. माणसांमध्ये 25 वर्षानंतर एक पिढी बदलते. त्यामुळे आपल्याला पुढच्या 200 वर्षांनी आपण मुलांना शिकवताना काय चूक केली ते शोधावे लागेल. आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगली शिकवण दिली नाही तर, कलिंगडासारखेच आपल्या बाबतीत घडू शकते. आपण प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार दिले पाहिजेत.