शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

कोकणात मुसळधार, मिनीट्रेनच्या स्थानकात साचले पाणी

By admin | Updated: August 2, 2016 02:54 IST

पावसाच्या संततधारेमुळे नेरळ बाजारपेठेतील रस्ते पाण्याने भरून वाहत होते.

नेरळ : पावसाच्या संततधारेमुळे नेरळ बाजारपेठेतील रस्ते पाण्याने भरून वाहत होते. जयहिंद नाक्यावरील चार दुकानांत पाणी शिरले. त्याचवेळी माथेरान मिनीट्रेनच्या नेरळ लोकोमध्ये सर्वत्र पाणी साचले होते, तर मिनीट्रेन थांबते ते तिन्ही फलाट पावसाच्या पाण्यात बुडून गेले होते. नेरळ पाडा भागातील नाल्यात सर्व परिसरातील पाणी वाहून येत असल्याने ते सर्व पाणी पुढे माथेरान मिनीट्रेन थांबते त्या स्टेशन भागात साचले होते. >अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसाननांदगाव/ मुरुड : मुरु ड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून, भातशेतीचे नुकसान झाले आहे. ३,९०० हेक्टर जमिनीत भातशेतीचे पीक पूर्ण तालुक्यातून घेतले जाते. पावसामुळे भात रोपे कुजली आहेत. शासनाने आता वाट न बघता शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मुरु ड तालुका राष्ट्रवादी पक्षाचे निरीक्षक फैरोझ घलटे यांनी के ली आहे. मुरु ड तालुक्यात रविवारी १८९ मिलीमीटर एवढा पाऊस झाला असून, पाण्याखाली सर्व शेती गेली आहे. मुअज्जम महाडीक यांची दीड एकर शेती, विलास दगडू पाटील यांची चार एकर शेती व हमीद हाल्डे अशा अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले आहे. या आदांड, उसरोळी, नांदगाव वाळवंट, खारदोडकुले आदी भागात मोठे नुकसान झाले असल्याचे यावेळी फैरोझ घलटे यांनी सांगितले.>चौल -रेवदंड्यात जनजीवन विस्कळीतरेवदंडा: गेले दोन दिवस मुसळधार पावसाने चौल -रेवदंडा परिसराला झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट आहे. शाळेतील उपस्थिती घटलेली जाणवत आहे. अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली असून सखल भागात पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली आहेत. या पावसामुळे सुपारी पिकाला धोका निर्माण झाला आहे.>संततधर पावसामुळे भातशेती धोक्यातकार्लेखिंड : अलिबाग तालुक्यात पावसाने गेल्या तीन दिवसात उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसामुळे भातरोपे वाहून जाणे व कुजण्याच्या स्थितीत आहेत. यावर्षी सुरुवातीलाच पहिली पेरणी केलेली बियाणे रुजले नसल्यामुळे दुसऱ्यांदा पेरणी करावी लागली परंतु अतिपावसामुळे ती सुद्धा व्यवस्थित रुजली नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आहे त्या रोपांमध्ये लावणी उरकली आहे. अलिबागमध्ये ९५ टक्के लावणी झाली आहे.>अंबा नदी तुडुंबनागोठणे : रविवार दुपारपासून संततधार पडणाऱ्या पावसाने अद्याप विश्रांती घेतली नसल्याने अंबा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पुराचे पाणी शहरात भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन काही अंशी विस्कळीत झाले आहे. >रस्त्यावर पाणीच पाणीश्रीवर्धन : तालुक्याला पावसाने झोडपल्याने नद्या तुडुंब भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खलाटीत पाणी साचल्याने शेती पूर्ण पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. >तळ्यात वाहतूक ठप्पतळा : धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वरळ येथील पूल कोसळला आहे. कुंभारवाड्यातील वायकर यांचे घर कोसळले आहे. मुठवली येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे इंदापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.