शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

‘बिल्ट’चा पाणीपुरवठा बंद करा!

By admin | Updated: May 21, 2016 01:08 IST

बिल्ट ग्राफिक कंपनीचा पाणीपुरवठा बंद करा अथवा दुष्काळ दूर होईपर्यंत कंपनीचे कामकाज बंद करावे,

भिगवण : बिल्ट ग्राफिक कंपनीचा पाणीपुरवठा बंद करा अथवा दुष्काळ दूर होईपर्यंत कंपनीचे कामकाज बंद करावे, या मागणीसाठी जनजागृतीच्या कार्यकर्त्यांनी सहा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या परिसरातील शेतकरी या उपोषणाला पाठिंबा देऊन कंपनीच्या विरोधात आवाज उठवीत आहेत.सध्या उजनीच्या काठावरील गावांनादेखील या संकटाला सामोरे जावे लागत आहे. असे असताना बिल्ट पेपर आणि विटांच्या कारखान्याला मात्र २४ तास पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, कंपनीने या दुष्काळी परिस्थितीत तीन महिने पुरेल एवढा मोठा पाणीसाठा करून ठेवला आहे. पाणीसाठा असताना कंपनी लाखो लिटर पाणी उजनीतून उपसत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. माणसांना, जनावरांना पिण्यचे पाणी मिळत नसताना कंपनी कागद आणि विटा तयार करण्यासाठी मुबलक पाण्याचा वापर करीत असल्याचे विदारक सत्य समोर येत आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी असेल, तर ती पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडून अधिग्रहण केली जाते; परंतु बिल्ट कंपनीबाबत मात्र हा निकष लावला जात नाही. तसेच, कंपनीला वाचविण्यासाठी उजनीचे अधिकारी मात्र उजनीमध्ये तीन वर्षे पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगतात. यामुळे ज्या शेतकऱ्याच्या शेतजमिनी उजनीसाठी गेल्या, असे शेतकरी पाण्यावाचून उपाशी आणि बिल्ट कंपनी तुपाशी, अशी परिस्थिती सध्या तरी आहे. यासाठी काही शेतकरी आणि जनजागृतीचे संजय चांदू भोसले आणि गणेश विलास देवकाते यांनी कंपनीच्या गेटसमोर सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. भोसले व देवकाते यांनी कंपनीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करावा, अशी मागणी केली आहे.>जुने कारखाने : बंद करता येत नाहीसध्या उजनी धरणात पाऊस नाही पडला, तरी तीन वर्षे पिण्यासाठी पाणीसाठा असल्याचे सांगून शासन निर्णयानुसार १० वर्षांपूर्वीच्या कोणत्याही कारखान्याचे पाणी बंद करू नये, असा आदेश आहे. - राजेंद्र गायकवाड , उपअभियंता,उजनी धरण