शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘बिल्ट’चा पाणीपुरवठा बंद करा!

By admin | Updated: May 21, 2016 01:08 IST

बिल्ट ग्राफिक कंपनीचा पाणीपुरवठा बंद करा अथवा दुष्काळ दूर होईपर्यंत कंपनीचे कामकाज बंद करावे,

भिगवण : बिल्ट ग्राफिक कंपनीचा पाणीपुरवठा बंद करा अथवा दुष्काळ दूर होईपर्यंत कंपनीचे कामकाज बंद करावे, या मागणीसाठी जनजागृतीच्या कार्यकर्त्यांनी सहा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या परिसरातील शेतकरी या उपोषणाला पाठिंबा देऊन कंपनीच्या विरोधात आवाज उठवीत आहेत.सध्या उजनीच्या काठावरील गावांनादेखील या संकटाला सामोरे जावे लागत आहे. असे असताना बिल्ट पेपर आणि विटांच्या कारखान्याला मात्र २४ तास पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, कंपनीने या दुष्काळी परिस्थितीत तीन महिने पुरेल एवढा मोठा पाणीसाठा करून ठेवला आहे. पाणीसाठा असताना कंपनी लाखो लिटर पाणी उजनीतून उपसत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. माणसांना, जनावरांना पिण्यचे पाणी मिळत नसताना कंपनी कागद आणि विटा तयार करण्यासाठी मुबलक पाण्याचा वापर करीत असल्याचे विदारक सत्य समोर येत आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी असेल, तर ती पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडून अधिग्रहण केली जाते; परंतु बिल्ट कंपनीबाबत मात्र हा निकष लावला जात नाही. तसेच, कंपनीला वाचविण्यासाठी उजनीचे अधिकारी मात्र उजनीमध्ये तीन वर्षे पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगतात. यामुळे ज्या शेतकऱ्याच्या शेतजमिनी उजनीसाठी गेल्या, असे शेतकरी पाण्यावाचून उपाशी आणि बिल्ट कंपनी तुपाशी, अशी परिस्थिती सध्या तरी आहे. यासाठी काही शेतकरी आणि जनजागृतीचे संजय चांदू भोसले आणि गणेश विलास देवकाते यांनी कंपनीच्या गेटसमोर सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. भोसले व देवकाते यांनी कंपनीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करावा, अशी मागणी केली आहे.>जुने कारखाने : बंद करता येत नाहीसध्या उजनी धरणात पाऊस नाही पडला, तरी तीन वर्षे पिण्यासाठी पाणीसाठा असल्याचे सांगून शासन निर्णयानुसार १० वर्षांपूर्वीच्या कोणत्याही कारखान्याचे पाणी बंद करू नये, असा आदेश आहे. - राजेंद्र गायकवाड , उपअभियंता,उजनी धरण