शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

‘बिल्ट’चा पाणीपुरवठा बंद करा!

By admin | Updated: May 21, 2016 01:08 IST

बिल्ट ग्राफिक कंपनीचा पाणीपुरवठा बंद करा अथवा दुष्काळ दूर होईपर्यंत कंपनीचे कामकाज बंद करावे,

भिगवण : बिल्ट ग्राफिक कंपनीचा पाणीपुरवठा बंद करा अथवा दुष्काळ दूर होईपर्यंत कंपनीचे कामकाज बंद करावे, या मागणीसाठी जनजागृतीच्या कार्यकर्त्यांनी सहा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या परिसरातील शेतकरी या उपोषणाला पाठिंबा देऊन कंपनीच्या विरोधात आवाज उठवीत आहेत.सध्या उजनीच्या काठावरील गावांनादेखील या संकटाला सामोरे जावे लागत आहे. असे असताना बिल्ट पेपर आणि विटांच्या कारखान्याला मात्र २४ तास पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, कंपनीने या दुष्काळी परिस्थितीत तीन महिने पुरेल एवढा मोठा पाणीसाठा करून ठेवला आहे. पाणीसाठा असताना कंपनी लाखो लिटर पाणी उजनीतून उपसत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. माणसांना, जनावरांना पिण्यचे पाणी मिळत नसताना कंपनी कागद आणि विटा तयार करण्यासाठी मुबलक पाण्याचा वापर करीत असल्याचे विदारक सत्य समोर येत आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी असेल, तर ती पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडून अधिग्रहण केली जाते; परंतु बिल्ट कंपनीबाबत मात्र हा निकष लावला जात नाही. तसेच, कंपनीला वाचविण्यासाठी उजनीचे अधिकारी मात्र उजनीमध्ये तीन वर्षे पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगतात. यामुळे ज्या शेतकऱ्याच्या शेतजमिनी उजनीसाठी गेल्या, असे शेतकरी पाण्यावाचून उपाशी आणि बिल्ट कंपनी तुपाशी, अशी परिस्थिती सध्या तरी आहे. यासाठी काही शेतकरी आणि जनजागृतीचे संजय चांदू भोसले आणि गणेश विलास देवकाते यांनी कंपनीच्या गेटसमोर सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. भोसले व देवकाते यांनी कंपनीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करावा, अशी मागणी केली आहे.>जुने कारखाने : बंद करता येत नाहीसध्या उजनी धरणात पाऊस नाही पडला, तरी तीन वर्षे पिण्यासाठी पाणीसाठा असल्याचे सांगून शासन निर्णयानुसार १० वर्षांपूर्वीच्या कोणत्याही कारखान्याचे पाणी बंद करू नये, असा आदेश आहे. - राजेंद्र गायकवाड , उपअभियंता,उजनी धरण